Web development is the process of building, programming...
बारव बारव बारव
मराठवाड्यतील सांस्कृतिक, ऐतिहासिक वैभव भर घालणारी वालूरची बारव
वालूर गाव परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील असून गावात माणकेश्वरचे मंदिर आहे. तसेच या गावात पूर्वी चार बारव होत्या त्यापैकी दोन सुस्थितीत आहेत.
महर्षी वाल्मिकी यांची तपोभूमी अशी आख्यायिका असलेल्या एकेकाळच्या वैभव संपन्न वालूर गावात भारतीय बार्स स्थापत्यकलेचा एक अप्रतिम नमुना पहावयास मिळतो. आठ बाजूनी चक्राकार पायऱ्या असणारी दोन टप्प्यातील हि बारव. येथील आठ बाचूच्या आठ देव कोष्टामुळे प्राचीन बारव स्थापत्य म्ह्टटोपूर्ण ठरते. Helical Step म्हणजेच पेचदार किंवा सर्पिल रचनेच्या पायऱ्या असणारी हि बारव दोन स्तरातील असून पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यावर जाण्यासाठी शंकू आकाराची दगडी रचना पहावयास मिळते.
वाळूरची बारव जमिनीपासून खलु तीन टप्प्यात आहे. गोल आकाराच्या या बारवेल मजबूत असा दगडी गोठ असून खाली उतरण्यासाठी आठ बाजूने उतरण्यासाठी पहिली स्तरावर प्रत्येकी नऊ पायऱ्या आहेत. तर पहिली स्तराखाली आठ देवकोष्टक आहेत. पुन्हा आठ बाजूचा आणि प्रत्येकी नऊ पायऱ्याव्ह दुसरा स्तर आहे. पायर्यांचा स्तर संपल्यानंतर सात ते आठ फूट खोलीचा व साडेतीन चार फूट रुंदीचा गोल खड्डा आहे. एकंदरीत बर्वेची खोली हि ३४ फूट खोल असावी. बारव वरून बघितल्यानंतर भुईचक्राच्या आकाराची दिसते.
गावकऱ्यांच्या श्रमदानातून पुंनजीवित झालेली हातनूर येथील बारव
यादवकालीन बारव स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना आणि त्याच्या जिर्नोद्धारसाठी गावकऱ्यांनी चालवलेले अभिनव अभियान याचा उत्कृष्ट मिलाप म्हणजे हतनूर. आपल्या मिळकतीतीय किमान एक टक्के ईश्वरीय कार्याला देण्याचे ठरवून त्याद्वारे मंदिर आणि बारव याचे शास्त्रीय दृष्ट्या पुनर्बांधणी करण्याचे कार्य ग्राम शक्तीने दाखवून दिले. हतनूर ता. सेलू जि. परभणी येथील श्री नागनाथ मंदिर परिसरातील सुमारे सग हजार चौरस फूट क्षेत्रफळाची ५० फूट खोल असणारी बारव खिळखिळ्या अवस्थेत आज स्वच्छ पाण्याचे स्रोत म्हणून उजळून निघाली आहे.
या बर्वेला चारही बाजूने प्रवेशद्वार असून पहिल्या दोन टप्प्यानंतर दुसऱ्या टप्प्यात जाण्यासाठी प्रशस्त भ्रमण मार्ग असून पुनर्बांधणी नंतर मूळ स्वरूपात दर्शनी केली आहे. या बारव च्या कुंडामध्ये एक भुयार असल्याचे गावकरी सांगतात. सदर मंदिरामध्ये महाशिवरात्रीनिमित्त अनोखा उत्सव साजरा करण्यात येतो. तसेच बर्वे मध्ये दीप प्रज्वलित करून दीपोत्सव साजरा होताना नयनरम्य दृश्य पाहण्यास मिळतो.
प्राचीन शिवमंदिरांची शोभा वाढवणारे पिंगळी येथील भव्य व सुस्थितीतील बारव
परभणी जिल्ह्यात प्राचीन मंदिर स्थापत्य वर्षात मोलाची भर घालणारे पिंगळेश्वर महादेव मंदिर असलेल्या पिंगळी या गावी याच मंदिर परिसरात सुमारे ९ हजार चौरस फूट क्षेत्र भव्य अशा प्रकारे बारव प्राचीन जलव्यवस्थापनाची साक्ष देत मंदिर परिसराचे सौदंर्य वाढवत आहे.
परभणीच्या पूर्वेस ११ कि. मी. अंतरावर पिंगळगदा नदीच्या काठावर पिंगळी हे गाव आहे. गावात पिंगळेश्वराचे यादवकालीन(हेमाडपंती) शैलीचे त्रिदलीय मंदिर आहे. मंदिरास पश्चिम, दक्षिण व उत्तरेस तीन गर्भगृह आहेत. पैकी पश्चिमेकडील गर्भगृह मुख्य असून सध्या यामध्ये पिंगळेश्वराची मूर्ती व शिवलिंग आहे.
मंदिरालगतच एक विस्तीर्ण चौरसाकृती अशी बारव आहे. बारवेस एकूण चाळीस पायऱ्या असून ती निमुळती होत जाते. शेवटून दोन नंबरच्या पायरीवर नऊ शिल्पे आहेत. बहुधा त्या आसरा असाव्यात.
या बारवेत चारही बाजुंनी खाली उतरता येते. बारवेमध्ये पाच विश्रामस्थळे आहेत. प्रस्तुत बारवेच्या प्रत्येक कोपऱ्यावर दोन-दोन अशी चार कोपऱ्यांवर आठ देवकोष्ट आहेत. पैकी एक देवकोष्ट भग्न झालेले आहे. या देवकोष्टात गणेश, नृसिह, नागदेवता, चामुंडा, लक्ष्मीनारायण, विष्णू व दुर्गा यांची शिल्पे आहेत. अभ्यासक व संशोधक विद्यार्थी, इतिहासप्रेमी यांनी एकदातरी पहावे असेच हे पिंगळीचे मंदिर व बारव आहेत.
लोकसहभाग व श्रमदानाच्या माध्यमातून पुनर्जीवित झालेली रायपूर येथील बारव
लॉकडाऊनच्या काळात मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करून रायपूर ग्रामस्थांनी श्रमदानाचा आदर्श समाजाला देत गालात लुप्त झालेल्या प्राचीन बारवेचे कलात्मक रूप प्रकाशित केले आहे. रायरेश्वर मंदिर परिसरातील ४ हजार चौ. फूट क्षेत्रफळाच्या या बर्वेच्या पायऱ्यांची रचना एकमेकांना छेद देणाऱ्या त्रिकोणासारखी वैशिष्ट्यपूर्ण भौमितिक रचनेची दिसून येते तसेच पायऱ्यांवर सुंदर नक्षीकाम केलेले दिसते.
चारठाणा येथील, गोकुळेश्वर मंदिराजवळ स्थित, बारव (पुष्कर्णी)
चारठाणा गाव म्हणजे प्राचीन स्थापत्यकलेचे जणू माहेजघर आहे. सात प्राचीन मंदिरे, एक स्तंभ आणि एक वैशिष्ट्यपूर्ण बारव हक प्राचीन वारसा इथे पाहावयास मिळतो.
चारठाणा येथील गोकुळेश्वर मंदिर परिसरात सुमारे चार हजार चौरस फूट क्षेत्रफळाची भद्रा या प्रकारातील भव्य बारव आहे. बर्वेच्या चारही बाजूला प्रवेश मार्ग असून एकूण २९ देव कोष्ट या बारवेत पाहण्यास मिळतात. बर्वेच्या उत्तर व दक्षिण प्रवेशद्वारातून थेट पाण्यापर्यंत प्रवेश करता येतो. पहिल्या टप्प्यावर चारही बाजूला सुंदर स्तंभाची रचना केलेली असून परभणी जिल्ह्यातील वैशिष्ट्यपूर्ण बारवेमध्ये या बारवेच्या समावेश करता येतो.
बारवाच्या चहुबाजूनी मंडप आहे. एकूण २४ खांबावर हा मंडप उभा आहे. मात्र उत्तरेकडील प्रवेशद्वारासमोरील ४ खांब पडल्यामुळे तेथील मंडप सध्या अस्तित्वात नाही मात्र खांब त्यांच्या जागेवर पडलेले आहेत. येथील खांबाच्या वरच्या बाजूस नाग आहेत व काही खांबांच्या मध्य भागी व्याल शिल्प आहेत. चहुबाजूनी असलेल्या मंडपाच्या भिंतीवर २७ देवळ्या आहेत. तसेच पूर्व-पश्चिम मंडपात बारवेच्या मधोमध दोन खोल्या आहेत. यातील पश्चिम खोलीमध्ये एक रहस्यमय वाटणारी देवळी आहे. तसेच या परिसरात भुयार असल्याचे स्थानिक सांगतात.
येथील बारवेत सध्या हिरवट पाणी आहे. काही स्थानिक ह्या बारवेतील पाण्याचा वापर आपल्या दैनंदिन वापरासाठी करतात.
१००० वर्षांपूर्वी बांधले गेलेले यादवकालीन व हेमाडपंथी शैलीतील पोखर्णी येथील बारव
मराठवाड्याचे जाजवल्या दैवत म्हणून ओळख असलेल्या पोखर्णी येथील श्री नृसिह मंदिराचा परिसर खूप मोठा आहे. मुख्य मंदिराचा गाभारा तीन फूट बाय चार फूट रूममध्ये आहे. प्रवेशद्वार तितकेच लहान आहे. हे मंदिर सुमारे १००० वर्षांपूर्वी बांधले गेले होते. मंदिराचे बांधकाम हि हेमांडपंथी वास्तू शैलीत आहे. श्री नृसिह मंदिराच्या पाठीमागे सुस्थितीतील पुष्करणी तीर्थ बारव असून पाण्याचा आजही दैनंदिन वापर होत आहे. या बारवेल एकूण २५ दगडी पायऱ्या असून २ देवकोष्ट आहेत. नृसिह मंदिरात दर्शनासाठी येणारे भाविक हि बारव तीर्थ बघितल्याशिवाय जात नाहीत. नृसिह मंदिराच्या जवळच हि बारव असल्याने तिला एक वेगळेधार्मिक ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
जलसंचयन प्रणालीचे एक उत्तम उदाहरण मानवत येथील बारव
मानवतच्या युवकांनी ४० दिवस मेहनत घेत बारवांची स्वच्छता आणि गाळ काढण्याचे केली काम नक्कीच प्रेरणादायी आहे.
मानवत शहरातील युवकांच्या स्वकर्तृत्वाने आपल्या ऐतिहासिक वारसा संवर्धन करण्याचे महान कार्य, जर ठरवले तर साध्य होऊ शकते याचे मूर्तिमंत उदाहरण आहे. पुनर्जीवित झालेल्या बारवेच्या या दगडांमधून, उजाड मातीएधून मोकळा श्वास मिळाल्येल्या ह्या जलधारा म्हणजेच जणू मानव-निसर्गाचे अद्भुत मिलन, असेच म्हणायला हवे.
गौर ता. पूर्णा येथील बारव
पूर्ण तालुक्यातील गौर या गावातील सुमारे सहा गजर चौरस फूट क्षेत्रफळाची भव्य बारव आहे. ह्या बारवेल २३ पायऱ्यांची रचना असूनही चारही बाजूने प्रवेश करता येतो. मध्यभागी चौरसाकृती कुंड असून बारवेत आठ देव कोष्ट आहेत. ज्यामध्ये देवतांच्या मूर्ती अस्तित्वात नाहीत.
आर्वी ता. परभणी येथील बारव
आजकाल भूजल साथ एवढ्या खाली गेला आहे कि अनेकदा पाच-सहाशे फूट खोल गेले रझ पाणी लागण्याची शक्यता नसते. परंतु आजही अस्तित्वात असलेल्या बारवांना बारमाही जिवंत पाणी असते हेही खरे. आटलेली बारव शक्यतो कुणाच्याही पाहण्यात येत नाही. भूमीअंतर्गत जलस्रोतांचा अचूक घेत बांधलेल्या या बारव नुसत्या स्थापत्यशात्रातील प्रगतीची उदाहरणे नवहते, तर भूजलशात्रातील आपल्या प्रगतीचीही चिन्हे आहेत.
भोगावची बारव
देवीचे शक्तीपीठ म्हणून प्रसिद्ध असलेल्या देवी साहेब भोगावं येथे अस्तित्वात असलेल्या तीन बारवापैकी दिघेवरील महादेव या नावाने प्रसिद्ध असलेल्या मंदिराजवळ अंदाजे १६ चौरस फूट क्षेत्रफळाची विविध मूर्ती शिल्प असणारी अंदाजे २४ फूट खोल बारव आहे.
पर्यटन आणि तिर्थस्थळं: तिर्थस्थळं: तिर्थस्थळं:
बारव
बारव म्हणजे पायऱ्या असलेल्या विहिरी. अशा विहिरी पाणीसाठा तर करतातच शिवाय त्या स्थापत्यशास्राचाही उत्तम नमुना मानल्या जातात. बारव म्हणजे पेशवेकाळात पाणी साठा तयार करण्यासाठी केलेली जागा. आजही अनेक प्राचीन बारव सुस्थितीत आढळतात. याचे मुख्य कारण म्हणजे त्यांचे बांधकाम ,त्यासाठी वापरलेले साहित्य.
श्री दिगंबर जैन अतिशय क्षेत्र निमगिरी संस्थान जिंतुर- Digambar Jain Atishay Kshetr Nemgiri
जिंतुर पासुन साधारण 3 कि.मी. अंतरावर नैसर्गिक सौंदर्यात वसलेले हे ठिकाण परभणी वासीयांचे आवडते ठिकाण आहे, कारण प्राकृतिक सौंदर्याने नटलेल्या या ठिकाणी अतिशय पवित्र वातावरणात निमगिरी आणि चंद्रगिरी नावाच्या दोन पर्वतांवर श्री दिगंबर जैन अतिशय क्षेत्र वसलेले आहे.
सहयाद्रि पर्वतांच्या उप रांगामधल्या पर्वतावर हे तिर्थक्षेत्र आहे.
या प्राचीन कलात्मक आणि चमत्कारी जैन गुफा आणि मंदिरं सर्वदुर प्रसिध्द असल्याचे सांगण्यात येते.
पुर्वी हे ठिकाण जैनपुर या नावाने ओळखले जायचे, राष्ट्रकुट साम्राज्यात या पवित्र स्थळाचा विकास झाला त्यानंतर आक्रमणकर्ते यांनी हे ठिकाण नष्ट केले आणि आता वर्तमानात हे जिंतुर म्हणुन ओळखले जाऊ लागले.
प्राचीन काळी जवळपास 300 जैन कुटुंब आणि 14 जैन मंदिरं येथे अस्तित्वात होती, काळाच्या ओघात मात्र आता केवळ 2 मंदिरं शिल्लक राहिली आहेत.
मुद्गलेश्वर महादेव मंदिर – Mudgaleshwar Temple
गोदावरी नदीच्या पात्रात मधोमध महादेवाचे मंदिर उभारले आहे.
अहिल्यादेवी होळकरांनी 250 वर्षांपुर्वी या मंदिराचे बांधकाम केल्याचे सांगितले जाते.
या मंदिराविषयी माहिती घेत असतांना हे मंदिर सुमारे 900 वर्षापुर्वीचे असल्याचे या ठिकाणी असलेल्या शिलालेखावरून लक्षात येते.
पावसाळयात तर हे मंदिर काही महिने पाण्याखालीच असते, या ठिकाणी नारायण नागबळी आणि सुखशांती करता पुजाअर्चा देखील केल्या जातात.
मुद्गल पुराणात या ठिकाणचा उल्लेख सापडतो याला देवभुमी देखील म्हंटल्या गेले आहे.
या ठिकाणी दर्शनाकरता येण्याचा योग्य कालावधी एप्रील ते जुन हा आहे.
भगवान शंकरा व्यतिरीक्त नृसिंहाचे आणि श्री गणेशाचे देखील मंदिर या ठिकाणी आहे. महाशिवरात्रीला असंख्य भाविक या मंदिरात मुद्गलेश्वराच्या दर्शनाकरता येतात.
श्री नेमिनाथ दिगंबर जैन मंदिर नवगढ – Shri Neminath Digambar Jain Temple Navagad
नवगढ येथील श्री नेमिनाथ दिगंबर जैन मंदिर आपल्या वास्तुकलेकरता आणि प्राचीन कलात्मकतेकरता फार प्रसिध्द आहे.
हे मंदिर पुर्णा नदिच्या किना.यापासुन 2 कि.मी. अंतरावर असुन साधारण 1931 साली हे मंदिर बनवण्यात आले आहे, त्यावेळेस या मुर्तीला येथे स्थापीत करण्यात आले.
या मंदिराच्या निर्माणाकरता निजामाने त्वरीत 10 एकर जमिन दिली होती.
नवगढ चे हे मंदिर कलात्मक, विशाल आणि खुप उंच शिखर आहे.
येथील देवगिरी भगवानाची सुरेख साडे तिन फुटाची मुर्ती काळया पाषाणात पद्मासनात विराजमान आहे.
मंदिराला आतल्या बाजुने चोहीकडे आरसे लावले असुन ते अतिशय सुंदर आणि रेखीव कलाकुसरीने केल्याने सुरेख भासते.
या शांत परिसराला भेट देण्याकरता नवगढ ते परभणी हे अंतर 40 कि.मी. तर नांदेड 60 कि.मी. अंतरावर आहे.
हजरत तुराबुल हक दर्गा – Dargah Hazrat Syed Shah Turabul Haq
हजरत तुराबुल हक दर्गा हे परभणीतले मुस्लीमांचे श्रध्दास्थान असुन आपल्या वार्षीक मोहात्सवाकरता फार प्रसिध्द आहे.
दरवर्षी 2 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी दरम्यान सर्व धर्माचे हजारो अनयायी या ठिकाणी एकत्र येतात.
ही दर्गा सर्व धर्म समभावाचे प्रतिक असुन संपुर्ण राज्यातुन भाविक दर्शनाकरता येथे येतात. भाविकांच्या अनुभवानुसार जे भाविक या ठिकाणी येतात त्यांच्या ईच्छा पुर्ण होतात अशी त्यांची भावना आहे.
या दग्र्याची लोकप्रीयता एवढी आहे की याला महाराष्ट्रातील अजमेर शरीफ देखील म्हंटल्या जातं.
उत्तम आरोग्याच्या आशेने देखील हजारो रूग्णं या ठिकाणी येतात. 2015 साली फेबु्रवारी महिन्यात उत्सवादरम्यान जवळजवळ 5 लाख भाविक या ठिकाणी आले होते.
नृसिंह मंदिर पोखर्णी – Narasimha Mandir
परभणी पासुन जवळजवळ 18 कि.मी. अंतरावर असलेले पोखर्णी हे गांव श्री नृसिंह संस्थानामुळे पंचक्रोशीत आणि जिल्हयात प्रसिध्द आहे. येथे महाराष्ट्रा व्यतिरीक्त आंध्र प्रदेशातुनही भाविक दर्शनाकरता येतात.
श्री नृसिंह भगवान याठिकाणी देवी लक्ष्मी सोबत विराजमान असुन हे जागृत देवस्थान म्हणुन प्रसिध्द आहे. मंदिर परिसर अतिशय विस्तीर्ण असुन गाभारा मात्र लहान आहे आणि या गाभा.यात प्रवेश करण्याचे व्दार अडीच ते 3 फुट असल्याने भाविकाला दर्शनाकरता वाकुन जावे लागते.
हे मंदिर अतिशय प्राचीन असुन जवळ जवळ 1000 वर्षांपुर्वी बनले असल्याचे सांगण्यात येते, वास्तुकला हेमाडपंथी असुन एका राजाने हे मंदिर बांधले आहे.
राजाच्या अंध मुलीला नृसिंह भगवानाच्या कृपेने दिसायला लागल्याने राजाची येथे अपार श्रध्दा बसली आणि त्याने नवीन मंदिर बनवुन मुर्तीला तेथे हलवण्याचा विचार व्यक्त केला पण गावक.यांनी त्याला विरोध केल्याने येथेच राजाने हे मंदिर बांधले.
महाराष्ट्र शासनातर्फे या तिर्थस्थळाला बी ग्रेड मिळाला असुन विकास कार्य प्रगतीवर असल्याचे पाहुन लक्षात येते.
मुर्ती क्रोधीत मुखवटयाची असुन सुवर्ण अलंकारांनी तिला सुशोभीत करण्यात येते. शेजारीच परमेश्वराकरता विश्रामासाठी मोराच्या पिसांनी गादी तयार केली आहे.
मंदिर परिसरात शिवलिंगाव्यतिरीक्त भगवान गणेशाचे देखील मंदिर आहे. पुष्करणी तिर्थ म्हणुन खोल विहीर असुन त्या विहीरीला चारी बाजुने सलग अखंड पाय.या आहेत. हे पुष्करणी तिर्थ 1200 वर्ष जुने असल्याचे बोलले जाते.
नृसिंहाच्या नवरात्रात आणि नृसिंह जयंतीला भगवंताचा उत्सव अतिशय दिमाखात साजरा होतो इतरवेळीही दर शनिवारी या ठिकाणी दर्शनाकरता गर्दी असते.
नृसिंहाच्या मुर्तीची दस.याला मिरवणुक निघते, ही मिरवणुक देवीची भेट घेतल्यानंतर परत माघारी येते. ही प्रथा देखील पुर्वापार चालत आल्याचे येथील भाविक सांगतात.
श्री साईबाबा मंदिर पाथरी – Sri Sai Janmasthan Temple, Pathri
श्री साईबाबांचे जन्मस्थान परभणी जिल्हयातील पाथरी असुन या ठिकाणी साई बाबांचे भव्य मंदिर उभारण्यात आले आहे. येथे साई बाबांची सिंहासनाधिष्ठीत मोठी मुर्ती असुन त्यांचे जन्मस्थान, त्यांचे मुळ घर, त्यांच्या घरातील भांडी, चमत्कारीक उदी, या सर्व गोष्टी या जागी अतिशय व्यवस्थित जतन करून ठेवल्या आहेत.
श्री साई स्मारक समितीने मंदिराकरता जागा घेउन तेथे भव्य असे मंदिर बांधले आहे, साधारण 1994 ला मंदिराची निर्मीती सुरू झाली आणि 1999 ला मंदिर भाविकांकरता खुले करण्यात आले.
श्री स्वामी साई शरणानंदाची या ठिकाणी प्रतिमा लावण्यात आली असुन त्यांना प्रत्यक्ष साई बाबांचा सहवास लाभला असल्याने त्यांनीच साईबाबांचा जन्म पाथरी या गावातला असल्याचे सांगितले त्यामुळेच ऐवढे पवित्र ठिकाण समजु शकल्याने त्यांची प्रतिमा आणि त्यांच्याविषयी विस्तृत माहिती या ठिकाणी लिहीली आहे.
त्यांच्या शेजारीच श्री बल्बबाबा यांची प्रतिमा आणि त्यांच्याविषयीची माहिती येथे लिहीली असुन त्यांनीच पाथरीला साईबाबांचे भव्य मंदिर तयार होईल अशी भविष्यवाणी केली होती.
श्री मृत्युंजय पारदेश्वर महादेव मंदिर – Shri Mrityunjay Pardeshwar Mahadev Temple
पारदेश्वर हे संगमरवरी मंदीर श्री स्वामी सच्चिदानजी सरस्वती यांनी बांधले आहे. विशाल शिवलिंग हे 80 फूट उंचीसह भगवान शिव यांना समर्पित आहे. मंदिराच्या वैशिष्ट्यपूर्णतेने शिवलिंग हे मुख्य मंदिर 250 किलोग्रॅम पाराड (बुध) आणि भारतातील सर्वात मोठे शिवलिंग हे आहे. परादल बनविलेले हे शिवलिंग तेजोलिंग असे म्हणतात आणि बारा ज्योतिर्लिंगाचे समान धार्मिक महत्व आहे.
परभणी माहिती माहिती माहिती
परभणी जिल्हयात एकुण 9 तालुके आहेत,
परभणी जिल्हयाविषयी उपयुक्त आणि वैशिष्टयपुर्ण माहिती:
क्षेत्रफळ 6,250.58 वर्ग कि.मी.
जिल्हयातील मुख्य भाषा मराठी
एकुण गावं 848
साक्षरतेचे प्रमाण 77.75%
1000 पुरूषांमागे स्त्रियांचे प्रमाण 958
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 222 हा या जिल्हयातुन गेला आहे.
परभणीत मराठवाडा कृषी विद्यापिठ असुन याचे नाव वसंतराव नाईक कृषि विद्यापीठ असे आहे.
शिर्डीच्या साईबाबांचा जन्म याच जिल्हयातल्या पाथरी गावचा.
शहराजवळ दत्तधाम हे दत्तपीठ आहे.
नर्सा चे नामदेव महाराज, गंगाखेड येथील संत जनाबाई, बोरी चे गणिती भास्कराचार्य याच जिल्हयातले.
राष्ट्रसंत संचारेश्वर पाचलेगावकर महाराज जिंतुर तालुक्यात पाचलेगांव या ठिकाणी जन्माला आले.
हजरत शाह तुराबुल हक दरगाह नावाचा मुस्लिम संतांचा मकबरा परभणी मधे आहे.
जिंतुर तालुक्यात जैन धर्माच्या निमगिरी नावाच्या गुफा आहेत.
परभणी जिल्ह्याचा इतिहास :
1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली तेव्हा ते राज्याचा एक भाग बनले. मराठवाड्यात नागरी हक्क क्रांती घडवून आणणाऱ्या नामांतर चळवळीदरम्यान परभणी जिल्हा आणि तेथील गावांना सांस्कृतिक वैराचा सामना करावा लागला.
वनक्षेत्र, वनस्पती व प्राणी :
वनस्पती व जंगल कमी असल्यामुळे जंगली प्राणी व पक्षांची देखील संख्या खूपच कमी आहे. येथील जंगलात बिबळ्या, कोल्हा, तरस, लांडगा, रानडुक्कर, सांबर, हरिण इ. प्राणी अजूनही आढळतात. परंतु त्यांच्या संख्येत पुष्कळच घट होत आहे. वन्य प्राणी शिकार प्रतिबंधक कायद्यामुळे या परिस्थितीत सुधारणा होत आहे.
नैसर्गिक जलाशय कमी असल्यामुळे जिल्ह्यात पक्षी फारच कमी आहेत. कबूतर, मोर, कवडे, सुतार, पाणकावळा, पाणबदके इ. पक्षी जलाशयांच्या आसपास आढळतात. जंगलांपासून मुख्यतः जळाऊ लाकूड, तेंडूची पाने व रोशा गवत मिळते.
शेती व्यवसाय :
नगदी पिकांमध्ये ऊस, कापूस व भुईमूग ही महत्त्वाची पिके होतात. अन्न पिकांखालील जमिनीचे प्रमाण 67.3% आहे. मात्र जलसिंचनाच्या सोयी उपलब्ध असलेल्या भागांत नगदी पिकांखालील जमीन वाढत असून, त्यामानाने अन्नपिकांखालील जमीन घटत आहे.
उद्योग धंदे :
वाहतूक :
हे नवी दिल्ली, बेंगलोर, हैदराबाद, चेन्नई, अजमेर, भोपाळ, अमृतसर, अलाहाबाद, रामेश्वरम, तिरुपती आणि विशाखापट्टनम सारख्या इतर भारतीय शहरांशीही जोडले गेले आहे. परभणीचे केंद्रीय बसस्थानक परभणीला आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, गुजरात आणि मध्य प्रदेश यासारख्या भारतातील इतर राज्यांशी जोडते.
समाज जीवन :
ते मुख्यतः कळमनुरी, हिंगोली, जिंतूर आणि वसमत या डोंगराळ तालुक्यांत आढळतात. खेड्यांतील घरे पर्यावरणात आढळणाऱ्या वस्तूंचा उपयोग करूनच बांधलेली असतात. पाऊस बेताचा असल्याने घरे धाब्याचीच असतात. साधारण आर्थिक परिस्थिती बरी असणाऱ्या शेतकऱ्यांची घरे दगड, विटा यांची असतात.
सामान्य शेतकऱ्यांच्या घरांचे धाबे लाकडी खांबांवर आधारलेले असून, भिंती मातीच्या असतात. गरीब लोकांची घरे झाडांच्या फांद्या, पाने आणि गवत यांनीच बांधलेली असतात. लोकांचे मुख्य अन्न म्हणजे ज्वारीची भाकरी, वरण किंवा आमटी, भाजी मांस आणि कधीकधी भात हे आहे.
भारताच्या 2011 च्या जनगणनेच्या वेळी, जिल्ह्याची 78.35% लोकसंख्या मराठी, 11.97% उर्दू, 4.99% हिंदी आणि 2.96% लंबाडी भाषा बोलते. जिल्ह्यात सर्वाधिक वापरल्या जाणार्या भाषांमध्ये मराठी, डेक्कन, उर्दू, आंध्र, हिंदी, इंग्रजी आणि इतरांचा समावेश होतो.
स्थानिक पक्षी पक्षी पक्षी
नैसर्गिक जलाशय कमी असल्यामुळे जिल्ह्यात पक्षी फारच कमी आहेत. कबूतर, मोर, कवडे, सुतार, पाणकावळा, पाणबदके इ. पक्षी जलाशयांच्या आसपास आढळतात. जंगलांपासून मुख्यतः जळाऊ लाकूड, तेंडूची पाने व रोशा गवत मिळते.
कबूतर
कबूतर, किंवा पारवा (शास्त्रीय नाव:Columba livia, कोलंबा लिविया; इंग्लिश:Rock Pigeon/Rock Dove, रॉक पीजन/रॉक डोव्ह) , ही कपोताद्य कुळातील पक्ष्यांची प्रजाती आहे. हे साधारणतः ३२ सें. मी. आकारमानाचे, निळ्या राखाडी रंगाचे पक्षी असतात. यांच्या पंखावर दोन काळे, रुंद पट्टे असतात, तर याच्या शेपटीच्या टोकावर काळा भाग असतो, मानेवर आणि गळ्यावर हिरवे-जांभळे चमकदार ठिपके असून, पंखाखाली पांढुरका रंग असतो, यांच्या चोची काळ्या रंगाच्या असतात, डोळे आणि पाय लाल रंगाचे असतात. नर-मादी दिसायला सारखेच असतात. यांचा आवाज खोल, गंभीर, गूटर-गूं, गूटर-गूं असा असतो.
हा पक्षी रंगाने पांढरा शुभ्र असल्यास त्याला कबूतर आणि पारव्या रंगाचा असल्यास त्याला पारवा म्हणतात.
विणीचा हंगाम जवळ जवळ वर्षभर असतो. वैशिष्टयच म्हणायचं तर पिल्लांना वाढवण्याची पद्धत. पिल्लं अगदी लहान असताना नरमादी त्यांना स्वतःच्या पोटातून येणारा एक प्रकारचा पक्ष्याच्या अनेक उपजाती आहेत, त्यातील कोलंबा लिव्हिया डोमेस्टिका ही उपजात माणसाळलेली, पाळीव असल्याने जास्त परिचित आहे. यांच्यावर आधारलेल्या जगातील सर्व भाषांमध्ये अनेक कथा, कविता, गाणी आहेत. विशेष प्रशिक्षण दिलेली कबुतरे माणसासाठी संदेशवहनाचे काम चोखपणे पार पाडतात. भारतात याच्याविषयी शिबी राजाची कथा प्रचलित आहे.
मोर
मोर बहुधा मोकळ्या जंगलात रानटी पक्ष्यांसारखे राहतात. निळा मोर हा भारत आणि श्रीलंकेचा राष्ट्रीय पक्षी आहे. नराची एक सुंदर आणि रंगीबेरंगी शेपटी असते, जी तो रोमान्ससाठी उघडतो आणि नृत्य करतो, विशेषत: वसंत आणि पावसाळ्यात. मोर हा एक लाजाळू पक्षी आहे जो एकांतात सहवास करतो. [५] मोराच्या मादीला मोरनी म्हणतात. जावई मोर हिरव्या रंगाचा असतो.
हा पक्षी जेव्हा पावसाळ्यात पंख पसरून नाचतो, तेव्हा जणू हिऱ्यांनी जडलेला शाही पोशाख परिधान केलेला दिसतो; म्हणूनच मोराला पक्ष्यांचा राजा म्हटले जाते. पक्ष्यांचा राजा असल्याने निसर्गाने आपल्या डोक्यावर मुकुटसारखा मुकुट घातला आहे. मोराच्या अद्भुत सौंदर्यामुळे भारत सरकारने २६ जानेवारी १९६३ रोजी त्याला राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित केले. आपला शेजारी देश म्यानमारचा ही राष्ट्रीय पक्षी मोरच आहे. 'फॅसियानिडी' कुलातील सदस्य असलेल्या मोराचे शास्त्रीय नाव 'पावो क्रिस्टेटस' असे आहे. इंग्रजी भाषेत याला 'ब्लू पीपल' किंवा 'पीकॉक' असे म्हणतात. संस्कृत भाषेत याला मयूर म्हणतात. मोर भारत आणि श्रीलंकेत मुबलक प्रमाणात आढळतो. मोर हा मुळात रानटी पक्षी आहे, पण अन्नाच्या शोधामुळे तो कधी कधी मानवी वस्तीपर्यंत पोहोचतो.
मोर हे सुरुवातीपासूनच माणसाच्या आकर्षणाचे केंद्र राहिले आहे. अनेक धार्मिक कथांमध्ये मोरांना उच्च दर्जा देण्यात आला आहे. हिंदू धर्मात मोरांना मारणे आणि त्यांना खाणे हे महापाप मानले जाते. भगवान श्रीकृष्णाच्या मुकुटातील मोरपंख या पक्ष्याचे महत्त्व दर्शविते. महाकवी कालिदास यांनी 'मेघदूत' या महाकाव्यात मोराला राष्ट्रीय पक्ष्यापेक्षा उच्च स्थान दिले आहे. राजे-महाराजांनाही मोर खूप आवडतात. प्रसिद्ध सम्राट चंद्रगुप्त मौर्याच्या राज्यात जी नाणी चालत असत, त्यात एका बाजूला मोर होते. मुघल बादशहा शाहजहान ज्या फलकावर बसायचा, त्याची रचना मोरासारखी होती. दोन मोरांच्या मध्ये राजाचे सिंहासन होते आणि त्यामागे मोराने आपले पंख पसरवले. हिरे आणि पानांनी बनवलेल्या या फलकाला 'तख्त-ए-तौस' असे नाव देण्यात आले. अरबी भाषेत मोराला 'ताऊस' म्हणतात.
मोराचे पंख)
नर मोराची लांबी सुमारे २१५ सेंटीमीटर आणि उंची सुमारे ५० सेंटीमीटर असते. मादी मोराची लांबी सुमारे ९५ सेंटीमीटर असते. नर आणि मादी मोर ओळखणे खूप सोपे आहे. नराच्या डोक्यावर मोठी कळी असते आणि मादीच्या डोक्यावर एक छोटी कळी असते. नर मोराच्या लहान शेपटीवर लांब आणि शोभेच्या पंखांचा गुच्छा असतो. मोरांच्या या पंखांची संख्या सुमारे दीडशेच्या आसपास आहे. मादी पक्ष्याला हे शोभेचे पंख नसतात. पावसाळ्यात मोर जेव्हा पूर्ण मजेत नाचतो तेव्हा त्याचे काही पंख तुटतात. तसेही वर्षातून एकदा ऑगस्ट महिन्यात मोराची सर्व पिसे पडतात. उन्हाळ्याच्या आगमनापूर्वी हे पंख पुन्हा बाहेर पडतात. मोर प्रामुख्याने निळ्या रंगाचा आढळतो, परंतु तो पांढरा, हिरवा आणि जांभळा रंगाचादेखील असतो. त्याचे वय २५ ते ३० वर्षे आहे. मोरनी घरटी घालत नाही, जमिनीवर सुरक्षित ठिकाणी अंडी घालते. मोरांच्या धावण्याचा वेग ताशी १६ कि.मी.
कावळा
कावळा हा एक काळ्या रंगाचा सहज आढळणारा पक्षी आहे. भारतीय कावळ्याचे मुख्य दोन प्रकार आहेत,एक गाव कावळा आणि दुसरा डोमकावळा.
कावळा हा रंगाने काळा असतो. कावळा माणसाच्या वसाहतीजवळ राहणारा पण घरात न येणारा, परिचित पक्षी आहे. हा पक्षी चलाख, सावध, चपळ खाण्यासाठी विशिष्ट आवड नसलेला, मृतभक्षी आहे.
गृह कावळा हा सुमारे १७ इं. (४२ सें. मी.) आकाराचा,मानेजवळचा भाग राखाडी रंगाचा तर उर्वरीत काळ्या रंगाचा एक पक्षी आहे. नर-मादी दोन्ही दिसायला सारखेच असतात. तर संपूर्ण काळ्या रंगाच्या कावळ्याला डोमकावळा असे म्हणतात. तसेच याला हुशार पक्षी म्हणून ओळखतात.कावळ्याला दोन डोळे असतात.
कावळा संपूर्ण भारतभर आढळणारा पक्षी असून भारताशिवाय तो बांगलादेश, नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंका, म्यानमार, मालदीव वगैरे देशांमध्ये सपाट भूप्रदेश ते डोंगराळ भागात सर्वत्र आढळतो.
गृह कावळ्याच्या आकार आणि मानेजवळील राखाडी रंगाच्या छटांवरून यांच्या किमान ४ उपजाती आहेत.
शिजलेले अन्न (भाजी, भात इ.), धान्य, उंदीर, लहान पक्षी, त्यांची अंडी, मृत जनावरे असे सर्व प्रकारचे खाद्य हे पक्षी खातात.
साधारणपणे एप्रिल ते जून हा काळ कावळ्यांचा वीणीचा काळ आहे. हे पक्षी जमिनीपासून किमान ३ मी. उंचीवर खोलगट, काटक्यांचे आणि मिळेल ते साहित्य वापरून घरटे तयार करतात. मादी एकावेळी ४ ते ५ फिकट निळी-हिरवी त्यावर तुटक तपकिरी रेषा असलेली अंडी देते. नर-मादी पिलांचे संगोपन मिळून करतात. कित्येकदा कावळ्याच्या घरट्यात कोकिळा आपली अंडी सोडून निघून जाते. अशा पिलांची देखभाल कावळेच करतात.
हिंदू संस्कृतीत माणसाच्या मृत्यूपश्चात तेराव्या दिवशी व प्रत्येक श्राद्धाच्या वेळेस कावळ्याला केळ्याच्या पानात जेवण देण्याची प्रथा आहे. तसेच रोजच्या अन्नातील एक घास कावळ्यासाठी काढून ठेवण्याची प्रथा आहे.यास काकबली असे म्हणतात. ज्ञानेश्वरीत कावळ्याचा उल्लेख आहे. पैं चंद्रोदया आरौते | जयांचे डोळे फुटती असते | ते काउळे केवी चंद्राते |ओळखती ||४.२४ || तसेच पैल तो गे काऊ कोकताहे सुद्धा ज्ञानेश्वरांची रचना प्रख्यात आहे. व्यकंटेश स्तोत्रात 'काकविष्ठेचे झाले पिंपळ ' असे म्हटले आहे. कारण पिंपळ, वड यांसारख्या झाडांची फळे कावळे खातात. त्यांच्या विष्ठेतून त्यांच्या बीया बाहेर पडतात आणि त्या रुजतात. 'कावळा म्हणे मी काळा , पांढरा शुभ्र तो बगळा दिसतसे' ही आठवणीतील कविता एके काळी शालेय क्रमिक पुस्तकात होती. कावळ्याच्या घरटे बांधाण्याच्या जागेवरून वर्षात होणाय्रा पावसाचा अंदाज बंधाला जातो.
सुतार
सुतार पक्षी हा एक झाडांमध्ये चोचीने मोठे भोक पाडून घरटे बनवणारा पक्षी आहे. सुतार जसे लाकडाचे काम करतो तसा हा पक्षी झाडात घरटे कोरतो. म्हणून या पक्ष्याला सुतार पक्षी असे नाव पडले.
सुतार पक्षी मुख्यतः झाडाच्या खोडांवर आणि फांद्यांवर कीटकांच भक्षण करतात आणि बहुतेक वेळा त्यांच्या चोचीने विशिष्ट प्रकारचा आवाज काढून एकमेकांशी संवाद साधतात. सुतार पक्षी हा ऑस्ट्रेलिया, न्यू गिनी, न्युझीलंड, मादागास्कर आणि अंटार्क्टिका सोडून जगभर सर्वत्र आढळून येणारा पक्षी आहे.
सुतार पक्षांनी परिस्थितीला जुळवून घेत बरेच बदल घडवलेले आहेत. त्यामुळेच ते स्वतःला इजा न करता लाकडावर जोरदारपणे मारा करू शकतात. त्यांची कवटी जाड आहे आणि मेंदूत शोषक ऊतकांद्वारे (absorptive tissue) उशी केली जाते, ज्यामुळे ते त्यांच्या डोक्याच्या वारांच्या शारीरिक धक्क्यांना सहन करण्यास मदत करतात. सुतार पक्षाची जीभ लांबलचक, काटेरी आणि चिकट असते ज्यातून किडे पकडता येतात. सुतार पक्ष्याची चोच टोकदार असते सततच्या मारामुळे ती वाढत राहते. झाडाच्या पृष्ठभागावर धरण्यास अनुकूल असावेत म्हणून सुतार पक्षांच्या पायाचे दोन बोटे पुढे आणि दोन मागे असतात.
बहुतेक सुतार पक्षी हे स्थिरावलेले आहेत व फार कमी प्रजाती स्थलांतरित आहेत. बहुतेक सुतार पक्षांच्या हालचालींचे वर्णन विखुरलेले आहे असे म्हणता येईल. तरुण पक्षी कडक हवामानापासून बचाव करण्यासाठी पळ काढून स्थलांतर करतात. काही प्रजाती स्थलांतरित असतात, उदाहरणार्थ, करड्या-रंगाच्या सुतार पक्षी हिवाळ्यातील महिन्यांत डोंगरावरून सखल भागात जातात.
बहुतेक सुतार पक्षी एकटे आयुष्य जगतात, परंतु त्यांचे वर्गीकरण हे असामाजिक प्रजातीपासून ते समूहात राहणाऱ्या प्रजातींमध्ये करता येऊ शकते.
पाणबदके
बदक हा एक उभयचर पक्ष्यांचा वर्ग आहे. हे पक्षी पाणी आणि जमीन दोन्ही ठिकाणी संचार करू शकतात.बदक हा पक्षी ॲनॅटिडी पक्षिकुलाच्या ॲनॅटिनी या उपकुलात याचा समावेश केलेला आहे. या उपकुलात सुमारे १२० जाती असून दक्षिण ध्रुव-प्रदेश सोडून जगाच्या निरनिराळ्या भागांत त्या आढळतात. बदक हा पाणपक्षी आहे. काही जाती केवळ गोड्या पाण्याच्या जवळपास राहणाऱ्या असतात, तर काही केवळ समुद्री असून त्यांची वीण नदीमुखाजवळ किंवा समुद्र-किनाऱ्यावर होते.
बदक हंसापेक्षा लहान आणि शरीराने स्थूल असते. मान आणि पाय आखूड असतात. पाय शरीराच्या बऱ्याच मागच्या बाजूला असतात. त्यांचा रंग पिवळा असून त्यांच्यावर पुढे तीन व मागे एक बोट असते; पुढची बोटे पातळ कातडीने जोडलेली असतात. चोच मोठी, रुंद, चापट व पिवळी असते; ती पातळ त्वचेने झाकलेली असते. चोचीच्या दोन्ही कडांवर बारीक दात असतात.सामान्यतः नर व मादी यांच्या शरीराची रंगव्यवस्था वेगळी असते. पाळीव बदकांचा रंग सामान्यपणे पांढरा असतो;पण काहींचा काळा किंवा तपकिरी असून त्यात हिरवट चमक असते; काहींचे धड पांढरे पण डोके व मान काळी असते. अंगावरील पिसे अतिशय दाट असून शेपटीच्या बुडाशी असलेल्या तेलग्रंथीचा स्त्राव बदके आपल्या चोचीने पिसांना नेहमी चोपडतात; त्यामुळे पाण्यात पोहताना ती पाण्याने भिजत नाहीत. शरीरावरील कातडीला चिकटून सगळ्या शरीरावर मऊ पिसांचे आवरण असल्यामुळे थंडीपासून निवारण होऊन शरीराची उष्णता कायम रहाते. पिसे दर वर्षी गळून पडून नवी येतात.
बदक हा पक्षी दक्षिण ध्रुव-प्रदेश सोडून जगाच्या निरनिराळ्या भागांत त्या आढळतात. इंडोनेशिया, तैवान व आग्नेय आशियातील काही देशांमध्ये बदकांची संख्या बरीच आहे. अमेरिकेतील ६० टक्के बदके लॉंग आयलंड या भागामध्ये आहेत. बहुसंख्य बदके पूर्व व दक्षिण भारतामध्ये आहेत. १९६६ च्या पशुधन गणनेनुसार भारतातील बदकांची संख्या ९९ लाखाच्या आसपास होती. पश्चिम बंगालमध्ये त्यांची संख्या सर्वात जास्त म्हणजे ५३ लाख ३० हजारांच्या आसपास होती व त्यानंतर आसाम, तमिळनाडू, आंध्रप्रदेश, केरळ बिहार व ओरिसा या राज्यांच्या क्रमांक लागतो. महाराष्ट्रातील बदकांची संख्या ४२,८०० होती.
पाळीव बदकांच्या १८ जाती आणि ३४ प्रकार असून ते सर्व दक्षिण अमेरिकेतील मस्कोव्ही व उत्तर गोलार्धातील मॅलार्ड या रानटी बदकांच्या दोन जातींपासून उत्पन्न झाले आहेत. पाळीव जातींमध्ये तऱ्हेतऱ्हेचे रंग दिसून येतात; शिवाय त्यांचे वजनही रानटी जातींपेक्षा तिप्पट असू शकते. बहुसंख्य जाती मॅलार्ड या जातीपासून निघालेल्या आहेत. कॅंबेल जातीमधील खाकी कॅंबेल ही बदकाची जात अंड्याविषयी प्रसिद्ध असून तिच्यापासून सरासरीने वर्षाला ३६५ अंडी मिळालेली आहेत. कोंबड्यांची सरासरी क्वचितच ३०० अंड्यांपेक्षा अधिक असते. अंड्यांच्या बाबतीत खाकी कॅंबेलनंतर व्हाइट कॅंबेल, डार्क कॅंबेल व इंडियन (देशी) रनर या जातींचा क्रमांक लागतो. मस्कोव्ही, पेकिन व आयलेसबरी बया बदकांच्या जाती मांसोत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत. अमेरिका व युरोपातील देशांमध्ये पहिल्या दोन जाती पाळल्या जातात, तर इंग्लंडमधिल लोक आयलेसबरी बदके पसंत करतात. या देशांमध्ये मांसोत्पादक बदकाच्या पिलांचे उत्पादन करणे हा एक संघटित व्यवसाय आहे. आयलेसबरी बदकांचे मांस पांढरे तर पेकिनचे पिवळे असते.
भारतामध्ये बदकांच्या पुढील जाती आहेत : इंडियन रनर, सिल्हेट मेटा व व्हाइट ब्रेस्टेड नागेश्वरी. इंडियन रनर बदके पांढऱ्या रंगाची असतात, तर सिल्हेट मेटा बदके तपकिरी रंगाची असून त्यांच्या पंखांची टोके काळी असतात व चोच पिवळी असते. नागेश्वरी जातीच्या बदकांचे शरीर काळ्या रंगाचे असते; पण छाती व गळा पांढरा असतो.
स्थानिक प्राणी प्राणी प्राणी
तुटपुंजे व विरळ जंगल आणि पाण्याचा तुटवडा यांमुळे जिल्ह्यात जंगली प्राणी व पक्षी फार थोड्या प्रमाणात आढळतात. बिबळ्या, कोल्हा, तरस, लांडगा, रानडुक्कर, सांबर, हरिण इ. प्राणी अजूनही आढळतात परंतु त्यांच्या संख्येत पुष्कळच घट होत आहे. वन्य प्राणी शिकार प्रतिबंधक कायद्यामुळे या परिस्थितीत सुधारणा होत आहे.
बिबट्या
बिबट्या ,बिबळ्या किव्हा वाघरू (Leopard) हा मार्जार कुळातील मोठ्या जातींमध्ये सर्वाधिक आढळणारा प्राणी आहे, परंतु मोठ्या जातींमध्ये आकाराने सर्वांपेक्षा लहान आहे.
बिबट्या व दक्षिण अमेरिकेतील जॅग्वार यांच्या स्वरूपामधे बरेच साधर्म्य असले, तरी बिबट्या हा जॅग्वारपेक्षा आकारमानाने लहान असतो. जॅग्वारच्याही त्वचेवर गुच्छाकृति छप्पे असले तरी, त्याच्या छप्प्यांमधे काळे ठिपके असतात, तसे बिबट्याचा छप्प्यांमधे नसतात.
याच्या अंगावरील ठिपक्यांमुळे चित्ता या प्राण्याशी नेहमी लोक गफलत करतात. खरेतर बिबट्या व चित्ता हे दोन्ही मार्जार कुळातील असले तरी दोघांच्यात खूपच फरक आहे. भारतातून चित्ता हा प्राणी पूर्णपणे नामशेष झाला आहे, तर बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
- चित्याचे ठिपके हे मुखत्वे भरीव असतात व बिबट्याचे ठिपके हे पोकळ असतात.
- चित्याची शरीरयष्टी लांबसडक व अत्यंत वेगाने पळण्यास सक्षम असते तर बिबट्याची बहुधा मांजराप्रमाणेच भरीव असते.
- बिबटे मनुष्यवस्तीजवळ रहाणे जास्त पसंत करतात व तेथील कुत्री, पाळीव जनावरे हे त्यांचे आवडते भक्ष्य आहे. यामुळेच दरवर्षी बिबट्या मनुष्यवस्तीत घुसण्याच्या शेकडो घटना घडतात. चित्ता मुख्यत्वे जंगलातच राहणे पसंत करतो.
बिबटे चपळ शिकारी आहेत. त्यांचा जातकुळीतील इतर मार्जारांपेक्षा जरी ते आकारमानाने लहान असले तरी त्यांच्या मोठ्या कवटीमुळे त्यांना मोठ्या भक्ष्यांची शिकार करता येते. बिबट्यांच्या आकारमानामध्ये बरेच वैविध्य आढळते. दक्षिण अफ्रिकेतील, श्रीलंकेतील व तुर्कस्थानातील बिबट्यांचे वजन ९० किलोपर्यंत असते, तर मध्यपूर्व वाळवंटी भागातील बिबट्यांचे वजन २० किलो पर्यंत असते. ही वैविध्यता भक्ष्याच्या उपलब्धतेवर व दर्जावर अवलंबून असल्याचे मानले जाते.
बिबट्यांच्या ठिपक्यांमधे देखील विविधता असते. त्यांचा पिवळ्या त्वचेमधे प्रदेशानुसार छटा असतात. पर्जन्यवनातील बिबट्यांची त्वचा गडद सोनेरी रंगाकडे झुकणारी असते, तर वाळवंटी भागातील बिबट्यांची त्वचा काहीशी फिकट असते; थंड प्रदेशांमधे थोडी करडी असते.
विणीचा हंगाम जवळ जवळ वर्षभर असतो. वैशिष्टयच म्हणायचं तर पिल्लांना वाढवण्याची पद्धत. पिल्लं अगदी लहान असताना नरमादी त्यांना स्वतःच्या पोटातून येणारा एक प्रकारचा पक्ष्याच्या अनेक उपजाती आहेत, त्यातील कोलंबा लिव्हिया डोमेस्टिका ही उपजात माणसाळलेली, पाळीव असल्याने जास्त परिचित आहे. यांच्यावर आधारलेल्या जगातील सर्व भाषांमध्ये अनेक कथा, कविता, गाणी आहेत. विशेष प्रशिक्षण दिलेली कबुतरे माणसासाठी संदेशवहनाचे काम चोखपणे पार पाडतात. भारतात याच्याविषयी शिबी राजाची कथा प्रचलित आहे.
कोल्हा
भारतीय कोल्हा ( शास्त्रीय नावः Canis aureus indicus (कॅनिस ऑरिअस इंडिकस); इंग्रजी: Indian Jackal ( इंडियन जॅकल );) हा भारतीय उपखंडातील पाकिस्तान, भारत, नेपाळ व बांग्लादेश या देशात आढळणारा मांसाहारी वर्गातील सस्तन प्राणी आहे. तो भारतात हिमालयाच्या पायथ्यापासून कन्याकुमारीपर्यंत सर्वत्र आढळतो.
भारतीय कोल्ह्याची उंची ३८–४३ सेंमी.; डोक्यासकट शरीराची लांबी ६०–७५ सेंमी.; शेपूट २०–२७ सेंमी.; वजन ८–११ किग्रॅ. असते. उत्तर भारतातील कोल्हे सर्वसाधारणपणे मोठे असतात.
कोल्ह्याचे लांडग्याशी बरेच साधर्म्य असले, तरी लांडगा जास्त उमदा दिसतो. कोल्ह्याचा रंग भुरकट तपकिरी काळसर असतो. रंग भोवतालच्या भौगोलिक व हवामानाच्या परिस्थितीप्रमाणे बदलतो. खांदे व कान यांच्याजवळील आणि पायांचा रंग काळा, पांढरा व पुसट पिवळसर यांचे मिश्रण असतो. हिमालयातील कोल्ह्यांचा रंग जास्त पिवळसर पण कानांवर व पायांवर पिवळा रंग जास्त गडद आणि काळपट असतो.
तरस
तरस हा एक समूह बनवून राहणारा प्राणी आहे. हा प्राणी आफ्रिका व आशिया खंडांमध्ये आढळतो. या प्राण्याचा आवाज माणूस हसल्यासारखा असतो म्हणून याला 'लाफिंग ॲनिमल' (हसणारा प्राणी) असेही म्हणतात. तरस मांसभक्षक असतो. पट्टेरी तरस भारत, नेपाळ, पाकिस्तान तसेच मध्य पूर्वेतील देश व उत्तर आफ्रिका, केन्या, टांझानिया, अरबी द्वीपकल्पात आढळतात. भारतात उत्तर भारत, मध्य प्रदेशात तरस सापडतात.
भारतात सध्या सुमारे १००० ते ३००० तरस आहेत. तरी तरसांना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
प्रजनन (Reproduction)- याच्या मिलन व विणीबद्दल फार कमी माहिती आहे. हिवाळा याचा मिलनऋतू असतो. पिलांचा जन्म उन्हाळ्यात होतो. तरसाला एका वेळेस तीन ते चार पिलं होतात. पिलांचे डोळे जन्मत: बंद असतात. पिलं लहान असतानादेखील त्यांच्या अंगावर आडवे पट्टे असतात. शरीरावर पांढरट मऊ केस असतात. परंतु मानेवर पूर्ण वाढलेल्या तरसासारखे आयाळीचे केस नसतात.
लांडगा
भारतात लांडग्यांच्या तीन उपजाती आढळतात: (१) कॅ. ल्युपस पॅलिपीस (भारतीय लांडगा), (२) कॅ. ल्युपस चँको (तिबेटी लांडगा) आणि (३) कॅ. ल्युपस ल्युपस (यूरोपियन लांडगा). त्यांपैकी भारतीय लांडगा ही उपजाती भारतात सामान्यपणे सर्वत्र आढळते. तिचा प्रसार दक्षिण व पश्चिम आशियातील हिमालयाच्या दक्षिण भागापासून पाकिस्तान, अफगाणिस्तान, इराण, इराक, संयुक्त अरब अमीराती राज्ये, ओमान, येमेन, सिरिया, टर्की, इझ्राएल, ईजिप्त इत्यादी ठिकाणी झालेला दिसून येतो. भारतात लांडग्याची आणखी एक प्रकारची जाती कॅ. हिमालयेन्सिस (हिमालयीन लांडगा) या नावाने ओळखली जात असून ती अल्प संख्येने आढळते.
भारतीय लांडगा आणि यूरोपीयन लांडगा दिसायला जरी सारखे असले, तरी भारतीय लांडगा आकाराने लहान असतो. त्याच्या शरीराची लांबी ९०–१०५ सेंमी., शेपूट ३५–४० सेंमी. लांब व खांद्यापाशी उंची ६५–७५ सेंमी. असते. भारताच्या मैदानी प्रदेशातील लांडगा भुरकट तांबूस ते फिकट तपकिरी रंगाचा असून त्याच्या छातीचा व पोटाचा रंग पांढरा किंवा फिकट असतो. त्याच्या अंगावर लहान-मोठे काळे ठिपके असतात. खांद्यावर गडद रंगातील ‘V’ अशा आकाराची खूण आढळते. जबडा लांब असून सुळे तीक्ष्ण असतात. शरीरापेक्षा पाय फिकट रंगाचे असून पोटाकडचा भाग पूर्णपणे पांढरा असतो.
सर्व लांडग्यांच्या सवयी बहुधा सारख्याच असतात. ते जोडीजोडीने अथवा टोळ्यांनी राहतात आणि शिकार करतात. उंदीर, घुशी, ससे, हरणे इत्यादींचा त्यांच्या भक्ष्यात समावेश होतो. क्वचित प्रसंगी ते मनुष्यवस्तीत शिरून गुरांवर व पाळीव जनावरांवर हल्ला करतात, तर कधीकधी ते लहान मुलेही पळवितात. भुकेलेला लांडगा वाटेल त्या प्राण्यांवर क्रूरपणे हल्ला करून भक्ष्य मरण्याची वाट न पाहता त्याचे लचके तोडून खातो. बुद्धी, शक्ती व युक्ती यांचा मिलाप त्याच्या ठिकाणी झालेला आढळतो. कृषिसंस्कृतीच्या उदयापासून मानव, त्याचे पाळीव प्राणी व मोठे शिकारी प्राणी यांना लांडगा हा धोकादायक प्राणी ठरला आहे. त्यामुळे त्यांची बेसुमार हत्या करण्यात आली आहे.
लांडग्यामध्ये नर-मादी आयुष्यभर सोबत राहतात. त्यांच्या प्रजननाचा काळ पावसाळा संपत असताना सुरू होतो. गर्भावधी ६०–६३ दिवसांचा असून पिले डिसेंबरमध्ये जन्मतात. एका वेळी ३–९ पिले जन्माला येतात. जन्माच्या वेळी पिलांचे डोळे बंद असून ते १४ दिवसांनंतर उघडले जातात. नर-मादी दोघे मिळून पिलांची काळजी घेतात. तीन वर्षांत पिलांची पूर्ण वाढ होते. नैसर्गिक अधिवासात लांडगा १२–१५ वर्षे जगतो.
वन्य लांडग्याच्या मादीचा पाळीव नर कुत्र्याशी संयोग होतो व त्यांच्यापासून प्रजननक्षम संकरित प्रजा निर्माण होते. हजारो वर्षांपूर्वी मानवी वस्त्यांजवळ येऊन राहिलेल्या वन्य लांडग्यांपासून पाळीव कुत्र्यांचे संकर तयार झाले आहेत.
डीएनए चाचणीच्या अभ्यासातून असे आढळले आहे की, हिमालयीन लांडगे सु. ८ लाख वर्षांपूर्वी तिबेटी लांडग्यांपासून वेगळे झाले. सध्या सु. ३५० हिमालयीन लांडगे नैसर्गिक अधिवासात, तर सु. २१ विविध प्राणिसंग्रहालयात आहेत. उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि जम्मू व काश्मीर या राज्यांत ते आढळतात. भारतातील प्राणिवैज्ञानिकांनी त्यांचा समावेश चिंताजनक लुप्तप्राय जातीमध्ये करावा असे सुचविले आहे. भारतीय लांडग्यांची संख्या २,०००–३,००० असून ते गुजरात, राजस्थान, हरयाणा, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेश या राज्यांत आढळतात. ते हिमालयीन लांडग्यांहून वेगळे आहेत. सु. ४ लाख वर्षांपासून त्यांच्यात आंतरसंकर झालेला नसल्याने या दोन्ही जातींना स्वतंत्र उपजाती मानून त्यांना कॅ. ल्युपस इंडिका व कॅ. ल्युपस हिमालयेन्सिस अशी शास्त्रीय नावे द्यावीत, असे सुचविले गेले आहे. १९७२ सालच्या वन्य जीवांचे रक्षण या कायद्यानुसार भारतात लांडग्यांना संरक्षण देण्यात आले असून त्यांच्या शिकारीवर पूर्णपणे बंदी आहे.
रानडुक्कर
रानडुक्कर : हा प्राणी समखुरीय गणातल्या सूइडी कुलातील सुस प्रजातीचा आहे. याचे शास्त्रीय नाव सुस स्क्रोफा आहे. हा यूरोप, उत्तर आफ्रिका, आशिया, जपान, मलाया द्वीपकल्प तसेच अमेरिकेतही आढळतो. भारतात हा जवळजवळ सगळीकडे आढळतो. गवताळ किंवा विरळ झुडपे असणाऱ्या जंगलात आणि क्वचित अरण्यात तो राहतो. पावसाळ्यानतंर पुष्कळदा यांचे कळप उभ्या पिकात शिरतात.
डोक्यासकट शरीराची लांबी दीड ते दोन मीटरपर्यंत आणि खांद्यापाशी उंची सु. एक मीटरपर्यंत असते. रंग काळा, तपकिरी किंवा काळसर करडा असतो. पिल्ले बदामी रंगाची असून त्यांच्या अंगावर फिक्कट अथवा काळसर पट्टे असतात. याच्या अंगावरचे राठ केस विरळ असतात आणि आयाळ काळ्या राठ केसांची असून ती डोक्याच्या मागच्या भागापासून निघून पाठीवर गेलेली असते. मुस्कटाचे टोक चापट, मांसल तबकडीसारखे असून त्यावर नाकपुड्या असतात. वरचे आणि खालचे सुळे लांब व वाकडे होऊन तोंडाच्या बाहेर आलेले असतात. हा चपळ असून वेगाने धावू शकतो त्याचप्रमाणे तो उत्तम पोहोणाराही आहे. यांचे लहान कळप असतात.
रानडुक्कर मुख्यतः शाकाहारी आहे. वनस्पतींची कोवळी खोडे, मुळे, कंद, धान्य, भुईमुगाच्या शेंगा इ. पदार्थ तो खातो पण यांशिवाय किडे, सडलेले मांस व इतर घाणेरडे पदार्थ तो खात असल्यामुळे त्याला सर्वभक्षी म्हणणे योग्य होईल. पहाट आणि संध्याकाळ या यांच्या भक्ष्य मिळविण्याच्या वेळा होत पण पुष्कळदा ते रात्रीही बाहेर पडतात. हे पिकांची बरीच नासधूस करतात.
रानडुकराचे घ्राणेंद्रिय अतिशय तीक्ष्ण असते. हा साहसी आणि बुद्धिमान प्राणी आहे. रानडुक्कर बहुप्रसव आहे. प्रजोत्पादनाचा ठराविक काळ नाही. सुमारे चार महिन्यांच्या गर्भावधीनंतर मादीला दर खेपेस ४–६ पिल्ले होतात.
नेपाळ, भूतान, आसाम आणि सिक्किममध्ये हिमालयाच्या पायथ्याच्या अरण्यात एक खुजा डुक्कर आढळतो. याचे शास्त्रीय नाव सुस साल्व्हॅनियस आहे. याची उंची २५ सेंमी, पेक्षा जास्त नसते. हे रात्रिंचर असून यांचे लहान कळप असतात.
सांबर
सांबर हरीण भारतात आढळणारी हरीणाची मुख्य जात आहे. याचे शास्त्रीय नाव Cervix unicolour असे आहे. भारतात आढळणाऱ्या हरीणांमध्ये आकाराने सर्वात मोठे हे हरीण आहे. खांद्या पर्यंत याची उंची साधारणपणे १ ते दीड मीटर पर्यंत भरते तर पूर्ण वाढलेल्या नराचे वजन सहजपणे ४०० ते ५०० किलो पर्यंत भरू शकते .याची वर्गवारी हरीणांच्या सारंग कुळात होते[२]. या कुळातील हरीणांच्या मादींना शिंगे नसतात. नरांची शिंगे भरीव असून दरवर्षी उगवतात व गळतात. शिंगाना अनेक टोके असतात. सांबरांच्या एका शिंगाला पुढे १ व मागे दोन अशी एकूण तीन टोके असतात. माद्या नेहेमी कळप करून रहातात त्यांचा कळप ८ ते १० जणांचा असतो. नर शक्यतो एकटेच असतात.सांबरांचे मुख्य खाद्य शाकाहारी असल्याने गवत, पाने, फळे इत्यादी आहे.
सांबराचे मुख्य शत्रु वाघ , बिबट्या, तळ्यांमधील मगरी , व रानकुत्री आहेत. आकार मोठा असल्याने वाघांचे सर्वात आवडते खाद्य आहे.
सांबर हे मुख्यत्वे भारतात किंवा भारतीय उपखंडात आढळते. विविध भागातील भौगोलिक परिस्थितीनुसार त्यांच्या शरीरात बदल घडले आहेत. त्यांचे नैसर्गिक वसतीस्थान हे दाट ते घनदाट जंगले आहे. त्यांची नोंद विषववृतीय अती घनदाट जंगलांपासून ते शुष्क पानगळीच्या जंगलात तसेच उत्तरेत सूचिपर्णी वृक्षांच्या जंगलात पण झाली आहे. भारतातील शुष्क काटेरी व वाळवंटी प्रदेश सोडून ते सर्व प्रकारच्या जंगलात आढळतात. परंतु दाट ते घनदाट जंगले ते जास्त पसंत करतात. तसेच पाण्याच्या जवळ राहणे ते पसंत करतात. म्हणूनच मुख्य राष्ट्रीय उद्यानात हे तेथील तलावांपाशी हमखास आढळून येतात.
सांबरांचा विणीचा हंगाम सप्टेंबर ते डिसेंबर असतो. या काळात नरांच्या शिंगाची वाढ पूर्ण झालेली असते. अनेक नर मादीच्या कळपावर हक्क प्रस्थापीत करण्यासाठी शिंगांनी चढाओढ करतात. यात सर्वात शक्तिशाली नर मादींच्या कळपाचा म्होरक्या होतो. माद्या साधरपणे मे ते जुनच्या दरम्यान प्रसावतात. जेणेकरून पावसाळ्याच्या महिन्यात नवीन पिल्लांना भरपूर खायला मिळते. पिल्ले लहान असतान अंगावर ठिपके असतात. परंतु जसे मोठे होतात ते विरळ होत जातात. पिल्लांची वाढ लवकर होते व दीड वर्षामध्ये पूर्ण विकसीत होतात.
हरिण
हरीण (लेखनभेद: हरिण) हे खुरधारी वर्गातील शाकाहारी जंगली प्राणी आहेत. हरणात दोन मुख्य प्रकार आहेत. एक सारंग हरीण (Cervidae) किंवा खरे हरीण आणि दुसरे कुरंग हरीण (Antelope).
सारंग हरीण उर्फ सारंगाद्य कुळ, यात सांबर, चितळ, कस्तुरी मृग, बाराशिंगा, भेकर, थामिन, रेनडियर, मूस, काश्मिरी हंगूल, भुंकरे सारंग, पारा हरीण (Hogdeer) तसेच पिसोरी इत्यादी हरणाचे प्रकार मोडतात. यांच्यात जवळपास सर्वच हरणांची दरवर्षी जुनी शिंगे गळून त्यांना नवीन शिंगे उगवतात.[१][२]
कुरंग हरीण हे गवयाद्य कुळातील उप कूळ आहे. यात काळवीट, नीलगाय, चिंकारा, चौशिंगा, पिसूरी हरीण, इंफाळा हरीण तसेच ग्रे ऱ्हिबॉक हरीण इत्यादी प्रकार मोडतात. यांच्यात एकदा आलेली शिंगे गळून पडत नाहीत.
हरीण, हा एक शाकाहारी सस्तन प्राणी एक आहे. हरणांच्या प्रत्येक पायाला सम संख्येत खुर असतात, त्यामुळे हरणांचा समावेश युग्मखुरी या गणात झाला आहे. जगातील विविध प्रांतातील वातावरणानुसार आणि हवामानानुसार हरणात विविध आकार आणि रंगसंगती आढळते. हरिण हे सहसा घनदाट अरण्य, वाळवंट, मैदानी जंगले व पर्वतरांगा वर दिसून येतात.
बहुतेक सर्व नर हरणांना शिंगे असतात. अपवादात्मक जातींच्या माद्यांना शिंगे असतात. परंतु माद्यांची शिंगे नरांच्या शिंगापेक्षा लहान आणि नाजूक असतात. हरिण हा प्राणी सहसा कळपाने राहतो. नर व माद्याचे कळप वेगवेगळे असून मिलन काळात ते एकत्र येतात.
पर्यटन धोरण धोरण धोरण
महाराष्ट्र राज्यात कॅरॅव्हॅन पर्यटन धोरण
• महाराष्ट्र राज्य पर्यटन धोरण – २०१६ मधील तरतुदीनुसार व कोरोना पार्श्वभूमीवर सुरक्षित पर्यटनाच्या दृष्टीने पर्यटकांचा खासगी वाहनांना प्राधान्य देण्याचा कल वाढला आहे.
• यासाठीच राज्यात कॅरॅव्हॅन पर्यटन धोरण राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे.
• या धोरणाची विभागणी दोन भागात केली आहे.
अ) कॅरॅव्हॅन
ब) कॅरॅव्हॅन पार्क
उद्देश
• राज्याच्या वैविध्यपूर्ण निसर्ग सौंदर्याचा पर्यटकांना लाभ
• खासगी गुंतवणुकीस प्रोत्साहन
• दुर्गम भागातील पर्यटनाला चालना देऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे.
• या धोरणासंदर्भात राज्यस्तरीय समिती असून पर्यटन विभागाचे सचिव अध्यक्ष असतील.
अ) कॅरॅव्हॅन पार्क
• मूलभूत सोयी – सुविधांनी युक्त अशा जागेवर लहान-मोठ्या कॅरॅव्हॅन उभ्या करून मुक्काम करता येईल.
• हे पार्क खासगी किंवा शासकीय जमिनीवर स्वत: जमीन मालक किंवा विकासक उभारू शकतील.
• पर्यटकांसाठी सुविधा – पाणी, रस्ते, वीजजोडणी, स्वच्छतागृहे, विकलांगांकरता व्हीलचेअर, सुरक्षाव्यवस्था इत्यादी
• स्थानिक प्राधिकरणास यासंबंधित परवानग्या देण्याचा अधिकार कॅरॅव्हॅन पार्क एमटीडीसीच्या पर्यटक निवासांच्या परिसरात मोकळी जमीन किंवा कृषी पर्यटन क्षेत्रांच्या ठिकाणी उभारता येतील.
ब) कॅरॅव्हॅन
• या व्हॅन्समध्ये किचन, बेड, टॉयलेट, सोफा, टेबल असून विश्रांती आणि निवासाची सोय
• प्रकार:
• सिंगल एक्सेल कन्व्हेन्शनल कॅरॅव्हॅन
• ट्विन एक्सेल कॅरॅव्हॅन
• टेन्ट ट्रेलर
• फोल्डिंग कॅरॅव्हॅन
• कॅम्पर ट्रेलर
• नोंदणी – परिवहन आयुक्तांकडे करावी.
• कॅरॅव्हॅन पार्क, कॅरॅव्हॅन, हायब्रीड कॅरॅव्हॅन पार्क – पर्यटन संचालक
• ऑनलाईन नोंदणी : www.maharashtratourism.gov.in
• नोंदणी शुल्क : ५ हजार रुपये
• नुतनीकरण : २ हजार रुपये
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (Maharashtra Tourism Development Corporation)
• स्थापना : १९७५ (मुंबई)
• कार्य : महाराष्ट्रातील पर्यटन व्यवसायाला चालना देऊन विकास करण्यासाठी शासकीय उपाययोजना करणे
• जागतिक पर्यटन दिवस : २० सप्टेंबर
• राष्ट्रीय पर्यटन दिवस : २५ जानेवारी
पर्यटनातून आर्थिक समृद्धी
http://mnsblueprint.org/m_03_09_infrastructure_environment.html
स्थानिक संस्कृती जोपासताना, स्थानिक उद्योजकांना प्रोत्साहन आणि आर्थिक पातळी उंचावण्यासाठी पर्यटन
ज्यांनी आपल्या देशातील फक्त पर्यटनस्थळं विकसित केल्यामुळे त्या देशातील आर्थिक प्रगतीची चाकं फिरू लागली असे आज आपण अनेक देश पाहतो. सिंगापूर हे त्यातलंच एक उदाहरण.
जिथे पर्यटन विकास होऊ शकतो अशी महाराष्ट्रात अनेक स्थळं आहेत. या ऐतिहासिक, निसर्ग सौंदर्यानं नटलेल्या क्षेत्रांचा विकास आपण करायला हवा. इथल्या पर्यटनातून स्थानिक उद्योजक घडले पाहिजेत, स्थानिकांना आर्थिक उत्पन्नाचं एक साधन मिळालं पाहिजे. असं करत गेलो तर आपली संस्कृती टिकेल, जोपासली जाईल.
प्रश्नाचं स्वरूप
महाराष्ट्राला अनेक प्रकारचं वैभव लाभलं आहे. राज्याचा ७५० कि.मी. चा समुद्र किनारा घ्या, विविध प्रकारची जंगलं आणि प्राण्या-पक्ष्यांचे अधिवास, समुद्रातले, डोंगरावरचे आणि बेटावरचे गड-किल्ले घ्या. थंड हवेची ठिकाणं, मंदिरे घ्या, बौद्ध आणि जैन धर्मियांच्या गुहा घ्या. हापूस आंबा घ्या, नागपूरची संत्रंबर्फी घ्या, राज्याच्या विविध प्रदेशातला खास असा महाराष्ट्रीय स्वयंपाक घ्या. पुणेरी काठाची साडी घ्या, पैठणची वैशिष्ट्यपूर्ण पैठणी घ्या, सोलापूरच्या सुती चादरी घ्या. गणपती उत्सव घ्या. अनेक लोकांनी उस्फूर्तपणे केलेले विविध वस्तूंचे, ग्रंथांचे संग्रह घ्या. आपल्याकडचे गोट्या आणि गंजिफ्यासारखे बैठे आणि दांडपट्ट्यासारखे लढाऊ खेळ घ्या. लेझीम, लावणी, ढोल-ताशा किंवा पेणचे गणपती घ्या.
कितीतरी वैशिष्ट्यं. आज देशातले आणि परदेशातले पर्यटक इथे येतात. आपल्याला, आपल्या समाजाला, मोठा इतिहास लाभला आहे आणि ही परदेशी पर्यटकांसाठी विशेष आकर्षणाची गोष्ट आहे. महाराष्ट्रात येणार्या भारतीय पर्यटकांची संख्याही लक्षणीय आहे. पण तरीही आपली पर्यटन क्षमता आपण पाहिजे तेवढी वापरत नाही असं आम्हाला वाटतं. देशात कुठेही नाहीत असे गड-किल्ले महाराष्ट्रात आहेत. या प्रत्येक गडाला मोठा रोमांचकारक इतिहास आहे. आपल्याला मात्र महाराष्ट्रात नेमके किती गड–किल्ले आहेत हे सांगणारी निश्चित नोंद कुठेही सापडत नाही.
महाराष्ट्रात जगानं मान्य केलेली ११ भौगोलिक वैशिष्ट्ये (geographical indicators) आहेत – महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी, नाशिकची द्राक्षे, सोलापूरची चादर, सोलापूरचा टेरी¬टॉवेल, पैठणची पैठणी, नाशिकच्या खोर्यानतली वाईन, पुण्याची पगडी, नागपूरची संत्री, कोल्हापूरची चप्पल, वारली चित्र आणि कोल्हापूरचा गूळ. रत्नागिरीचा आणि देवगडचा हापूस तसंच बीडची सिताफळे यांसाठीचे अर्ज सध्या प्रलंबित आहेत . अजंठा, वेरूळ, भाजे, भेडसा, कार्ला, पांडवलेणी, पितळखोरं येथील गुहा पहायला तर आजही असंख्य पर्यटक येतात. पण त्याहूनही अधिक संख्येनं पर्यटक येऊ शकतात का? तिथे त्यांना आवश्यक असलेल्या सोयी मिळतात का? त्या पर्यटन स्थळाची शोभा वाढवण्यासाठी, त्यांचं वैशिष्ट्य अधोरेखित करण्यासाठी काय करता येईल?
या प्रश्नांची उत्तरं शोधताना आजपर्यंत आपल्या पर्यटनस्थळांचा म्हणावा तसा विचार आपण केलेला नाही असंच म्हणावं लागतं.
पर्यटनामुळे हाताला काम मिळतं, उत्पन्नात ही भर पडतेच; या निमित्तानं आपली संस्कृती जपली जायला मदत होते, इतिहासाला उजाळा देता येतो. पुढच्या पिढीसाठी आपला इतिहास जिवंत राहतो. पण पर्यटनाकडे निव्वळ मनोरंजन म्हणून पाहता कामा नये; आराम, बदल, नवीन पाहण्याची, अनुभवण्याची संधी अशी अनेक उद्दिष्टं त्यात आहेत, मात्र पर्यटकांना ती साध्य करता यायला हवीत.
महाराष्ट्रात पर्यटनाच्या ठिकाणी पायाभूत सुविधांचा अभाव आहे. गावातील आणि छोट्या शहरातील युवकांचं पुणं, मुंबई आणि इतर मोठ्या शहरांमध्ये मोठ्या संख्येनं स्थलांतर होत आहे. महाराष्ट्रात आज पर्यटनाला चालना मिळावी आणि अशा अनेक तरुणांना रोजगार मिळावा असं पोषक वातावरण आपण देऊ शकणार नाही का?
असं का होतं
जुलै २०१२ मध्ये पश्चिम घाटातील एकूण ३९ ठिकाणांना एकत्रितपणे वारसा स्थळांचा (heritage site) दर्जा मिळाला. या पैकी ४ ठिकाणं म्हणजे कास पठार, चांदोली राष्ट्रीय उद्यान, कोयना आणि राधानगरी येथील अभयारण्यं महाराष्ट्रात आहेत. या संधीचा खरंतर पर्यटनासाठी किती फायदा करून घेता येईल. पण दोन वर्षात आपण जेवढं करू शकत होतो तेवढं केलं का?
लोहगड किल्ल्याभोवतालचं ३०% जंगल गेल्या ५ वर्षात नष्ट झालं आहे आणि सुमारे ४० नैसर्गिक नाल्यांनी / पाण्याच्या प्रवाहांनी आपले मार्ग तरी बदलले किंवा ते बंद तरी झाले आहेत. ही बातमी जानेवारी २०१४ मध्ये काही अभ्यासकांनी दिली. ते ऐकून काय केलं आपण?
पुण्यात स. गो. बर्वे चौकात बांधण्यात येणार्या ग्रेड सेपरेटरमुळे राष्ट्रीय महत्व असलेल्या पाताळेश्वर गुहांना इजा पोचू शकते असं आपला पुरातत्वविभाग सांगतो आहे, त्याची नोंद तरी आपण घेतली का?
प्रवास सुविधा, पर्यटन, स्वच्छता आणि आतिथ्य अशा वर्गवारीत महाराष्ट्र राज्य सतत मागे पडत आहे. राज्यात पर्यटनाला अतिशय वाव असूनही सरकारी यंत्रणेची अनास्था आणि उदासीनता आपण पर्यटन क्षेत्रात मागे पडण्यास सर्वस्वी कारणीभूत आहे. सक्षम रस्ते, रेल्वे गाड्या, पाणी, वीज, सार्वजनिक सुविधा, खाण्या-पिण्याची सोय, वैद्यकीय व्यवस्था, संपर्क साधनं या सोयी-सुविधा महाराष्ट्रातल्या कानाकोपर्यायपर्यंत पोचलेल्या नाहीत हे ही त्यामागचं मोठं कारण आहे. पर्यटनाचा विकास करत असताना, स्थानिकांना विचारात घेणं अपरिहार्य आहे; मात्र तसं न करता त्यांचं गाव पर्यटनस्थळ म्हणून जाहीर केल्यास अथवा काही योजना आखल्यास स्थानिकांचा पाठिंबा मिळत नाही. वास्तविक पाहता पर्यटनातून स्थानिकांना रोजगार मिळू शकतो. आपलाही फायदा होतो आहे हे लक्षात आल्यावर स्थानिकांना पर्यटन स्थळाविषयीची आस्था वाटते आणि ते स्थळ सांभाळले जाते.
याच्या जोडीलाच पर्यटनाचा आनंद घेण्याविषयीच्या आपल्या कल्पनाही बदलायला हव्यात. एखाद्या ठिकाणी जाऊन केवळ आपले त्या ठिकाणी फोटो काढून घेणं या पलीकडे जाऊन त्या स्थळाचा आनंद कशा कशा प्रकारे लुटता येईल, तिथला अनुभव कसा घेता येईल हे आपण शिकायला हवं आहे. आपल्या वागण्यामुळे त्या पर्यटनस्थळाचं काही नुकसान होत नाही ना, तिथे आलेल्या इतर पर्यटकांना आपल्यामुळे काही त्रास होत नाही ना, इ. बाबत आपण जागरूक राहायला हवं.
काय करायला हवं?
सर्वात प्रथम म्हणजे पर्यटनाकडे बघण्याची आपली दृष्टी बदलायला हवी. पर्यटन हा महाराष्ट्राच्या विकासाचा एक महत्वाचा पैलू आहे, स्थानिकांना बसल्याजागी उत्पन्नाचं एक नवीन साधन निर्माण होईल आणि आपली संस्कृती टिकवायलाही मदत होईल. हा तिहेरी हेतू साध्य करण्यासाठी पर्यटनाचा विकास आपण करायला हवा.
पर्यटनवाढीत स्थानिक लोकांचा सहभाग जितका जास्त असेल तितका त्या गावाचा / नगराचा विकास लवकर होऊ शकतो. रस्ते, वीज, पाणी यासारख्या मुलभूत सुविधा पर्यटनाच्या विकासाच्या विचाराने लवकरात लवकर पुरवता येऊ शकतील. स्थलांतर रोखल्यामुळे शहरावर अतिरिक्त ताण येणार नाही आणि युवकवर्ग आपापल्या ठिकाणीच राहिल्याने तिथला विकास होण्यासही मदत होईल.
हे सर्व पर्यटन विकासामुळेच घडू शकतं.
मार्गदर्शक तत्वं –
पर्यावरणाचा समतोल राखला जाईल अशाच पद्धतीनं पर्यटनविकास केला जावा -
प्रत्येक पर्यटनस्थळाच्या मर्यादा ओळखून, सांभाळून मगच तिथलं पर्यटन विकसित करायला हवं. पर्यटकांच्या गर्दीमुळे अथवा नैसर्गिक कारणांमुळे ज्या स्थळांचं नुकसान व्हायला सुरुवात झाली आहे त्या स्थळांना भेट देणार्याम पर्यटकांच्या संख्येवर हळूहळू मर्यादा घालायला हवी. अशा स्थळांवरचा पर्यटकांचा ताण कमी करण्यासाठी नवीन पर्यटनस्थळं विकसित करता येतील. महाबळेश्वर हे थंड हवेचं ठिकाण. २००१ मध्ये केंद्र शासनाच्या पर्यावरण मंत्रालयानं ते पर्यावरण-दृष्ट्या संवेदनशील क्षेत्र (eco-sensitive zone) म्हणून घोषित केलं आहे. महाबळेश्वरचं सौंदर्य आणि वैशिष्ट्य टिकवून ठेवण्यासाठी कदाचित, तिथे येणार्या पर्यटकांची वाढलेली संख्या पाहता तिथलं स्थानिक प्रशासन त्यावर मर्यादा आणण्याचा विचार करू शकेल. पश्चिम घाटातलाच आणखी एक पर्याय म्हणून आंबोलीचा विचार होऊ शकेल.
पर्यटनामुळे स्थानिक रोजगार निर्मिती व्हायलाच हवी -
वर्षानुवर्षे एकाच गावी राहणार्या् स्थानिक लोकांना आपल्या गावाबद्दल खडानखडा माहिती असते. ह्या माहितीचा उपयोग पर्यटन विकासासाठी उत्तमरीत्या करून घेता येऊ शकतो. इतिहासकार, पुरातत्वविभागातील संशोधक, त्या त्या विषयातील तज्ञ मंडळी इ. च्या मदतीनं प्रत्येक स्थळाविषयीची समग्र माहितीसुद्धा स्थानिकांनी एकत्र केल्यास पर्यटनस्थळाचं आकर्षण वाढू शकतं. तरुण, सुशिक्षित युवक-युवती पर्यटनदौर्यासचं सर्व व्यवस्थापन पाहण्याचं (tour operator) आणि वाटाड्या (guide) म्हणूनही प्रशिक्षण घेऊ शकतील. प्रेक्षणीय स्थळांचा इतिहास, सांस्कृतिक माहिती, त्या स्थळामुळे असलेलं त्या गावाचं भौगोलिक महत्व, इ. सारख्या गोष्टींचा अंतर्भाव या प्रशिक्षणात असावा. हा युवकवर्ग पर्यटकांसाठी आपल्या गावाचं प्रतीनिधित्व करू शकतो. तिथली स्थानिक आकर्षणं, खाद्यसंस्कृती, कला-कौशल्य, जैव-वैविध्य याची माहिती पर्यटकांना सांगू शकतो. ज्या मुला-मुलींमध्ये भाषाकौशल्य असेल ते एखादी परकीय भाषा शिकू शकतात, जेणेकरून त्यांना दुभाषे म्हणून काम करता येईल. या सर्वामुळे स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.
स्थानिक व्यावसायिकतेला चालना आणि उद्योजकतेला वाव मिळायला हवा –
पर्यटकांना स्थानिक खाद्यपदार्थांचा आस्वाद देण्यासाठी स्थानिकांनी चालवलेली अल्पोपहार केंद्रं असावीत, घरोघरी केलेली निवासाची सोय (homestay) असावी, त्यांना स्थानिक पेहेराव, कला, क्रीडाप्रकार, नृत्य – संगीत इ. कलाप्रकारांचा आनंद लुटता यावा म्हणून नियोजित केलेले कार्यक्रम, इ. अनेक प्रकाराने स्थानिक जनता पर्यटनाशी निगडीत कुठल्यातरी व्यवसायात गुंतू शकते.
महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीचं दर्शन पर्यटकांना देण्यात घरातील महिलेचा पुढाकार असू शकतो. त्यामुळे होणारा आर्थिक फायदा त्या महिलेला मिळेल आणि घरोघरी व्यावसायिक तयार होऊ शकतील. उदाहरणार्थ, कोकणात कोकण-मेवा (आंबा-पोळी, फणस-पोळी, कोकम सरबत, काजूची उसळ, इ.), खानदेशात बाकरवडी, पातोड्या तर देशावर ज्वारीपासून बनणारे विविध पदार्थ पर्यटकांचं आकर्षण बनू शकतील. शिवाय त्या त्या परिसरातली परिपूर्ण अशी जेवणाची मराठी थाळी आहेच.
याच धर्तीवर घरगुती निवासाची (homestay) कल्पना सुद्धा राबवता येऊ शकते. बर्याशच लोकांना, विशेष करून परदेशी पर्यटकांना स्थानिकांच्या जीवनशैलीबद्दल कुतूहल असतं. या पाहुण्यांना आपल्या सहलीतले एखाद-दोन दिवस स्थानिक लोकांसारखे राहण्याची सोय असू शकते. ही सोय गावातल्या लोकांच्या घरीच करता येईल. परदेशी पाहुण्यांना स्थानिकांसारखं खाणं-राहणं-पेहराव या साध्या सोप्या गोष्टीतून व्यवसायनिर्मिती होऊ शकते.
प्रत्येक गावाला / जिल्ह्याला आपली हस्तकला, शिल्पकला, नृत्य, संगीतसंस्कृती असते. ह्या कलेचं प्रदर्शन पर्यटकांसमोर करता येईल. पर्यटकांसाठी स्थानिक नृत्य, संगीत आणि लोककलेचे नमुने सादर करता येतील. स्थानिक लोकांनी केलेल्या हस्तकला, शिल्पकला, टिकाऊ खाद्यपदार्थ, शोभेच्या वस्तू इ. चे विक्रीकेंद्र उभारता येऊ शकतं. त्या निमित्तानं स्थानिक कलाकारांना वाव मिळेल आणि स्थानिक कला जिवंत राहील.
ज्या पर्यटनस्थळी शेती असेल, तिथले शेतकरी शेतीपर्यटन (agro-tourism) आयोजित करू शकतील. शेतावर राहण्याची सोय, शेतातील कामाची झलक यासारख्या गोष्टी या माध्यमातून जगभर पर्यटकांना आकर्षित करत आहेत, हे लक्षात घेऊन संक्रांत, हुल्गा, नागपंचमी, त्रिपुरी पोर्णिमा, इ. सारख्या सणांमध्ये पर्यटकांना सहभागी करून घेता येऊ शकेल.
पर्यावरणाचा समतोल राखून, स्थानिक रोजगार निर्मिती, उद्योजकतेला वाव तसंच संस्कृती संवर्धन होईल, अशा पद्धतीनंच पर्यटनविकास व्हावा म्हणून ही ३ तत्वं आम्ही सुचवत आहोत.
ही ३ तत्वं लक्षात ठेऊन, महाराष्ट्रात पर्यटनाची क्षमता पूर्णपणे विकसित करण्यासाठी खालील गोष्टी करायला हव्यात –
पर्यटनस्थळांचा शोध – अनेक लोकप्रिय ठिकाणं आहेत; त्याबरोबरच माहीत नसलेलीही अनेक ठिकाणे आहेत. ज्या गावांना / नगरांना पर्यटनविकास करण्यात रस आहे त्यांना आपलं ठिकाण नोंदणीकृत करण्याची संधी देऊन राज्यातली शक्य तितकी पर्यटन स्थळं जगाच्या पर्यटनाच्या नकाशावर टाकायला हवीत.
या प्रत्येक स्थळाचं वर्गीकरण –
• तिथे उपलब्ध असलेल्या सोयी-सुविधा आणि पर्यटनप्रकार, असं दुहेरी वर्गीकरण करून त्या स्थळाची विकास योजना बनवायला हवी.
• योजनेनुसार आणि स्थानिकांच्या मदतीनं प्रत्येक पर्यटनस्थळाचा विकास करायला हवा.
• प्रत्येक स्थळाची उत्तमरीत्या जाहिरात करायला हवी, ते पर्यटकांपर्यंत पोचवायला हवं.
• पर्यटनासाठी आवश्यक असं मनुष्यबळ राज्यात विकसित व्हावं म्हणून प्रशिक्षण संस्था सुरू करायला हव्यात.
• महाराष्ट्रातल्या पर्यटनस्थळांना भेटी देणार्याय, राज्यातील व देशातील पर्यटकांचं प्रबोधन करायला हवं.
महत्वाच्या कल्पना
• स्थानिकांनी ठरवल्यास आणि त्यांच्या पुढाकारानं पर्यटनक्षेत्रविकास
• महाराष्ट्र पर्यटनविकास महामंडळाचं रुपांतर पर्यटन नियामक आयोगात
• मुंबईचे बॉलिवूड – पर्यटनाचे आकर्षण
कार्यक्रम
महाराष्ट्रातलं पर्यटन क्षमता असलेलं प्रत्येक ठिकाण शोधून, तपासून त्याच्या विकासाची योजना आखायला हवी. हे शक्यतो स्थानिकांच्या पुढाकारानंच व्हावं; काही पहिल्या दर्जाच्या पर्यटन स्थळांचा विकास शासनाच्या पुढाकारानं, पण स्थानिकांच्या आणि नागरिकांच्या सहभागानं केला जाऊ शकेल.
प्रत्येक पर्यटन स्थळाचे पर्यटन क्षेत्र प्रकारात वर्गीकरण केलं जावं. आम्ही पर्यटन स्थळाच्या प्रकारानुसार एकूण ७ नमुने किंवा प्रारूपे (Destination Prototype) विकसित केली आहेत. प्रत्येक पर्यटन स्थळाला 'पर्यटन स्थळ विकास नमुना / प्रारूप' (Destination Development Prototype) याप्रमाणे विकसित करण्यात यावं असं आम्ही सुचवत आहोत (पहा परिशिष्ट १). महाराष्ट्रातील प्रत्येक पर्यटन स्थळ यापैकी एका पर्यटक क्षेत्र प्रकारातलं (destination prototype) असावं असं आम्हाला वाटतं.
ते ७ प्रकार असे -
• सांस्कृतिक पर्यटन (Heritage / Cultural Tourism) - गड, किल्ले, वाडे, World Heritage Sites इ.
• यात्रा-पर्यटन (Pilgrimage Destination) - देऊळ, तीर्थक्षेत्र, समाधिस्थळ, इ.
• साहस-पर्यटन (Adventure Tourism) - trekking, rappelling, para-gliding, डोंगर चढणं, इ.
• शेती-पर्यटन (Agro-Tourism) - शेती आणि शेतीशी संबधित असलेल्या पर्यटनाच्या संधी.
• निसर्ग पर्यटन (Eco-Tourism) - जंगलं, अभयारण्यं, इ.
• वैद्यकीय पर्यटन (Medical Tourism) - इस्पितळं, वैद्यकीय केंद्र, योगोपचार केंद्र, आयुर्वेदिक चिकित्सालय इत्यादी.
• समुद्राकाठचं पर्यटन (Beach Destination) - महाराष्ट्राचा ७२० किलोमीटरचा समुद्रकिनारा.
पर्यटन स्थळाच्या विकासाची योजना
पर्यटनवृद्धीतून आर्थिक समृद्धी आणायला काही गोष्टी अग्रक्रमानं करायला हव्यात. जिथे पहिल्यापसून पर्यटनाचा ओघ आहे ती स्थळं सक्षम करून मग नवीन स्थळांना वर आणायचं काम करण्यात यावं.
प्रत्येक पर्यटनस्थळ तिथे असलेल्या सोयीसुविधांनुसार विकसित करण्यात यावं. जिथे पायाभूत सुविधा पुरेश्या आहेत ते विकसित करायला प्राधान्य दिलं जावं. जिथे पर्यटन क्षेत्र आहे, पण पायुभूत सुविधांची सोय कमी आहे, त्या स्थळांचा प्राधान्यक्रम दुसरा असावा आणि ज्या स्थळांना पर्यटन संभाव्य आहे पण पायाभूत सुविधा अजिबात नाहीत, ती तिसर्या प्राधान्यक्रमानं विकसित केली जावीत. खालील आकृतीत पर्यटन स्थळ विकास प्राधान्यक्रम स्पष्ट केला आहे (पहा आकृती क्र. १)
पर्यटन स्थळ विकास प्राधान्यक्रम
पर्यटन स्थळ विकसित करण्यासाठी प्राधान्यक्रम आणि त्याचं प्रारूप ठरवावं
पर्यटन स्थळ विकास प्राधान्यक्रम
प्रत्येक पर्यटन स्थळाचं पर्यटन प्रकारात वर्गीकरण केलं जावं. या अंतर्गत प्रत्येक स्थळी खालील प्रमाणे किमान
सोयी-सुविधा असाव्यात -
पर्यटन स्थळ विकास नमुना / प्रारूप किमान सोयी-सुविधा
पर्यटकांसाठी माहिती केंद्र –
• तिथल्या राहण्याच्या-खाण्याच्या सोयींबद्दल माहिती देणारं, त्या स्थळाचं ऐतिहासिक, भौगोलिक महत्व दर्शवणारं माहितीपत्रक, चित्रफिती पर्यटकांना उपलब्ध असाव्यात.
• सर्व आर्थिक श्रेणीतल्या पर्यटकांना परवडतील अशी राहण्याच्या सोय असावी.
• प्रशिक्षित स्थानिक वाटाडे (guides) उपलब्ध असावेत.
• स्थानिक हस्तकला आणि खाद्य विक्रीचं अधिकृत केंद्र असावं.
• केंद्रसरकारने सुचवलेल्या निकषांना(service level benchmarks) अनुसरून भरपूर आणि स्वच्छ सार्वजनिक सुविधा असाव्यात.
• ठिकठिकाणी पर्यटन स्थळाविषयी माहिती देणारे फलक, उदा. वेळापत्रक, सार्वजनिक सुविधा, दिशांचे माहिती फलक, इ. असावेत.
• योग्य आरोग्यविषयक आणि मलनिस्सारण व्यवस्था (sewerage and sanitation system) असावी.
• पर्यटनस्थळाचा विकास पर्यावरणसंवर्धनाच्या चौकटीतून व्हावा (carrying capacity and development control regulation)
पर्यटनाचे विपणन (मार्केटिंग)
पर्यटनाचे विपणन (मार्केटिंग) दोन निकषांवर केलं जावं - पर्यटनस्थळाचा विकास प्राधान्यक्रम आणि तिथे येणारा पर्यटकवर्ग.
पर्यटक स्थळाचा विकास प्राधान्यक्रम तिथे असलेल्या मुलभूत सोयी-सुविधा, रस्ते, वाहतूक सुविधा इ. वर अवलंबून असल्यामुळे त्या त्या स्थळाचं मार्केटिंगचं तंत्र बदलेल. तसंच विविध पर्यटकांपर्यंत पोचण्यासाठी मार्केटिंगच्या वेगवेगळ्या पर्यायांचा अवलंब करायला हवा. आपल्याकडे येणारा पर्यटक राज्यातला, परराज्यातला किंवा परदेशी असू शकतो, त्याची खर्च करायची क्षमता वेगवेगळी असू शकते. तसंच त्याचं पर्यटनाचं प्रयोजनही वेगवेगळं असू शकतं, उदा. यात्रा, मौज-मजा, कामकाज, शैक्षणिक पर्यटन इत्यादी. ही विविधता लक्षात घेऊन जास्तीतजास्त पर्यटकांपर्यंत त्या स्थळाची माहिती पोचावी यासाठी प्रयत्न करायला हवेत. सध्या संकेतस्थळावरूनच प्रवासाचे बेत आखता येऊ शकतात, तिकीटविक्री, रेल्वे गाड्यांचे बुकिंग इ. होऊ शकतं. याचा फायदा घेऊन पर्यटनाचं संकेतस्थळ विकसित करता येऊ शकेल.
पर्यटन प्रदर्शनातून महाराष्ट्राचं मार्केटिंग करता येऊ शकेल. म्हणून विविध ठिकाणी – राज्यांमध्ये तसंच परदेशी अशा पद्धतीची प्रदर्शनं आयोजित केली जाऊ शकतात.
प्रत्येक रेल्वेस्टेशनावर, विमानतळावर आणि बसस्थानकांवर पर्यटकमाहितीकेंद्र असू शकेल. नियतकालिकं, वर्तमानपत्रं यातून महाराष्ट्रातल्या विविध पर्यटनस्थळांची माहिती प्रसिद्ध करता येऊ शकते.
महाराष्ट्रपर्यटनमार्गदर्शिका दर वर्षी प्रसिद्ध करता येईल. खासगी प्रवास / सहल आयोजकांबरोबर संलग्नपणे काम करता येईल.
शिवाय याचबरोबर भौगोलिक वैशिष्ट्य म्हणून घोषित झालेल्या त्या त्या भागांतील सर्वोत्तम उत्पादनांना जागतिक बाजारपेठेत विशेष स्थान मिळवून देता येईल. महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी, नाशिकची द्राक्षं आणि वाईन, नागपूरची संत्री, कोल्हापूरचा गूळ, रत्नागिरीचा आंबा, पुणेरी पगडी, पैठणी साडी, सोलापूरची चादर, वारली चित्रकला यासारख्या उत्पादनांच्या प्रदर्शनासाठी आणि विक्रीसाठी एक स्वतंत्र कार्यालय उभारलं जाऊ शकेल, ज्याअंतर्गत या विशेष उत्पादनांचं प्रदर्शन व विक्री होईल. अशा प्रदर्शनांची व विक्री केंद्रांची शाखा प्रत्येक जिल्ह्यात उघडता येईल.
प्रशिक्षित मनुष्यबळ विकास
महाराष्ट्राला अव्वल दर्जाचं पर्यटनक्षेत्र म्हणून मान्यता मिळवायची असेल तर त्यासाठी लागणारं प्रशिक्षित मनुष्यबळ आपल्यालाच तयार करावं लागेल. पर्यटनासाठी लागणारं विशेष कौशल्य (माहिती सांगायचं कसब, सांस्कृतिक शिक्षण, परकीय भाषाशिक्षण इ.) पुरवू शकतील अशा प्रशिक्षणसंस्था उभ्या राहायला हव्यात. पर्यटन-क्षेत्र-प्रारुपाप्रमाणे योग्य असं मनुष्यबळ विकसित करायला हवं. सांस्कृतिक पर्यटन-क्षेत्राची ऐतिहासिक, भौगोलिक आणि स्थानिक हस्तकला, शिल्पकला इत्यादींविषयीची आवश्यक अशी माहिती या शिक्षणातून मिळवता येईल. साहसी पर्यटन-क्षेत्रातील गाईड्सना परिचिकित्सक प्रशिक्षण (paramedical skills) असणं आवश्यक असेल.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचं रुपांतर पर्यटन नियामक आयोगात
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळानं (MTDC) समन्वयकाची भूमिका घ्यावी असं आम्हाला वाटतं. खासगी कंपन्यांबरोबरच्या स्पर्धेत उतरण्यापेक्षा विश्रामगृहांना, हॉटेलस्, resorts वगैरे विकसित करणार्याक कंपन्यांना मार्गदर्शक तत्वं, मानदंड आखून देऊन नियामक आयोगाची जबाबदारी महामंडळानं बजावावी. महामंडळाच्या अखत्यारीत येणारी विश्रामगृहं, हॉटेल इ. खासगी कंपन्यांना चालवायला द्यावीत.
पर्यटकांचं प्रबोधन
सर्व पर्यटनस्थळांवर माहितीफलकांद्वारे पर्यटकांचं प्रबोधन केलं जावं. मौजमजेबरोबरच पर्यटनस्थळी पाळायची शिस्त सुद्धा अधोरेखित केली जावी. स्वच्छता ठेवण्यासारखे नियम तर सगळ्याच ठिकाणी असावेत पण काही नियम त्या त्या ठिकाणच्या वैशिष्ट्यांना अनुसरून केले जावेत. जसं वन-पर्यटनाच्या वेळी बोलताना आवाज हळू ठेवावा, गाणी लावू नयेत इ. समुद्रपर्यटनक्षेत्रात भरतीच्या वेळी समुद्रावर जाऊ नये यासारखे नियम पर्यटकांकडून कसोशीनं पाळले जावेत म्हणून आग्रह धरायला हवा.
परिशिष्ट १ - पर्यटनक्षेत्रप्रकार आणि त्यानुरूप स्थळाचा विकास
१.सांस्कृतिक पर्यटन
(Heritage / Cultural Tourism): गड, किल्ले, वाडे, World Heritage Sites, इ.
१.१ केंद्रसरकारनं आखलेल्या "Model Heritage Regulations" ला अनुसरून ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वास्तूंचं संवर्धन केलं जावं; या वास्तूंजवळ अतिथिगृहं आणि विश्रामगृहं बांधावीत.
१.२ या वास्तूंच्या जतनासाठी पर्यटकांच्या आणि तिथं काम करणार्यांeच्या संख्येवर मर्यादा असावी.
१.३ सांस्कृतिक वास्तूच्या भोवताली पायवाटा विकसित करण्यात याव्यात.
१.४ ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ठेव्याविषयी माहितगार असे गाईड उपलब्ध असावेत.
१.५ वास्तू ज्या काळातली आहे त्या काळातले कपडे, रोजच्या वापरातील वस्तू, खाद्य पदार्थ, जीवनशैली दर्शविणार्याक गोष्टींचं संग्रहालय असावं.
१.६ शाळा-महाविद्यालयातील अभ्यास-गट त्यांच्या इतिहास- प्रकल्पांसाठी इथे येऊ शकतील असं वातावरण असावं.
१.७ ऐतिहासिक महत्व सांगणार्याआ चित्रफिती, फिल्म, परिसंवाद आयोजित केले जावेत.
१.८ ऐतिहासिक काळात असायची तशी तलवारबाजी, घोडेस्वारी, पारंपारिक खेळाची प्रात्याक्षिकं असावीत. पर्यटकांना त्यात सहभागी करून घेतलं जावं.
२. यात्रा-पर्यटन
(Pilgrimage Destination) देऊळ, तीर्थक्षेत्र, समाधी स्थळ, इ.
२.१ तीर्थक्षेत्रं आणि त्याभोवतीचं संवर्धन development control regulation प्रमाणे व्हावे.
२.२ धर्मशाळा आणि राहण्याच्या व्यवस्था मुबलक असाव्यात.
२.३ भरपूर आणि स्वच्छ सार्वजनिक सोयी-सुविधा असाव्यात.
२.४ खाण्या-पिण्याच्या सोयी उत्तम पण स्वस्त दरात असाव्यात.
२.५ स्थानिक खाद्य विक्रीची आणि पूजा साहित्याची अधिकृत केंद्र असावीत.
२.६ उरूस, सण, जयंती, पुण्यतिथीनिमित्तानं होणार्याअ गर्दीच्या नियमनाची चोख व्यवस्था केली जावी. या ठिकाणी पोलीस यंत्रणा सक्षम असावी.
२.७. परिपक्व मलनिस्सारण व्यवस्था असावी.
२.८ बस आणि रेल्वे स्थानकावरून पर्यटकांना ने-आण करण्यासाठी बस-व्यवस्था (shuttle service) असावी.
२.९ पादत्राणं सुखरूप काढून ठेवायची व्यवस्था असावी.
२.१० प्रदक्षिणा घालायला, देवदर्शनाच्या रांगेत उभं राहतान ऊन-पावसापासून संरक्षण देणारं छत असावं.
३. साहस-पर्यटन
(adventure tourism) trekking, rappelling, para-gliding, डोंगर चढणे, इ.
३.१ हिमालयन mountaineering institute च्या धर्तीवर सह्याद्री mountaineering institute ची स्थापना करण्यात यावी. येथं mountaineering चं प्रशिक्षण देता यावं.
३.२ अद्ययावत सुरक्षानियमावली कार्यरत असावी.
३.३ गाईडसना परिचिकित्सकाचं प्रशिक्षण देण्यात यावं (paramedical skills)
३.४ सह्याद्रीतलं जैव-वैविध्य जोपासून पायवाटांची आखणी करण्यात यावी.
३.५ स्वच्छ सार्वजनिक सोयी-सुविधा असाव्या.
३.६ तंबूत आणि गावातल्या घरांमध्ये राहण्याची सोय असावी.
३.७ Trekking and Camping चं साहित्य विकण्यासाठी अधिकृत केंद्र असावं.
४. शेती-पर्यटन
(agro-tourism) शेती आणि त्याच्याशी संबधित असलेल्या पर्यटनाच्या संधी
४.१ शेतावर राहण्याची उत्तम सोय असावी.
४.२ मराठी खाद्य संस्कृतीची ओळख इथे होऊ शकेल असं वातावरण असावे.
४.३ सार्वजनिक स्वच्छतेची उत्तम सोय असावी.
४.४ गाय, बैल, कोंबड्या, बकर्याीपालनाचं प्रात्यक्षिक व मार्गदर्शन व्हावं.
४.५ भाजीपाला, फळबागा, धान्यलागवडीची प्रात्याक्षिकं केली जावीत.
४.६ बैलगाडी आणि tractor मधून फेरी मारायची सोय असावी.
४.७ पर्यटकांना पारंपारिक खेळ खेळण्याची संधी मिळावी आणि प्रात्यक्षिकं दिली जावीत. उदा. विटी-दांडू, सूरपारंब्या इत्यादी.
५. निसर्ग-पर्यटन
(Eco-tourism) जंगलं, अभयारण्य
५.१ जैव-वैविध्यात प्रशिक्षण घेतलेले गाईड असावेत.
५.२ पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी core zones, buffer zones and tourism zones आखण्यात यावेत.
५.३ वन्यजीवन माहिती कक्ष उभारण्यात यावा.
५.४ परिसरातील शेवटच्या १ किलोमीटरमध्ये फक्त पायी किंवा सायकलवरून जाता येईल आणि पर्यावरणाशी समतोल राखणार्या गाड्याच जाऊ शकतील अशी सोय असावी.
५.५ या परिसरातील हॉटेल, resorts ना green-star rating असल्यावरच परवानगी देण्यात यावी.
५.६ पर्यटनव्यवसायाकरिता लागणार्या सर्व वस्तू देशी, स्थानिक बनावटीच्या आणि पर्यावरणाला हानी न पोचवता बनवलेल्या असाव्यात.
५.७ पक्षी-निरीक्षण, वनस्पतींचा अभ्यास, वन्यजीव निरीक्षण, वन्यजीवन फोटोग्राफी यासारखे उपक्रम राबवले जावेत.
६. वैद्यकीय-पर्यटन
(medical tourism) इस्पितळे, वैद्यकीय केंद्र, योगोपचार केंद्र, आयुर्वेदिक चिकित्सालय, इत्यादी
६.१. आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्रप्राप्त (international certification) सोयी-सुविधा देण्यात याव्यात.
६.२ वैद्यकीय आचार-नीती कसोशीने पाळली जावी.
६.३ हॉस्पिटल आणि रोग्यांमध्ये दुवा साधणा-या प्रशिक्षित व्यक्ती कार्यान्वित असाव्यात.
६.४ रोग्यांच्या आप्तेष्टांना राहण्याची आणि जेवणाची आरामदायक व्यवस्था असावी.
७. समुद्राकाठचे पर्यटन
(beach destination) महाराष्ट्राचा ७२० किलोमीटरचा समुद्रकिनारा
७.१ प्रशिक्षित जीवन-रक्षक किनार्या लगत असावेत.
७.२ कोकण खाद्य-पर्यटनक्षेत्र विकसित व्हावे.
७.३ प्रत्येक आर्थिक स्तरातील लोकांसाठी त्यांना परवडेल अशी राहण्याची व्यवस्था केली जावी.
७.४ काही विशेष किनारे विकसित केले जावेत, उदा. आंबा किनारा -जिथे आंब्याची झाडे असतील, कासव किनारा - जिथे कासवे अंडी घालतात, जैव-वैविध्य असलेला किनारा इ.
My Services
-
Elisc is a leading web design agency with an award-winning design team that creates innovative, effective websites that capture your brand, improve your conversion rates, and maximize your revenue to help grow your business and achieve your goals.
In today’s digital world, your website is the first interaction consumers have with your business. That's why almost 95 percent of a user’s first impression relates to web design. It’s also why web design services can have an immense impact on your company’s bottom line.
That’s why more companies are not only reevaluating their website’s design but also partnering with Elisc, the web design agency that’s driven more than $2.4 billion in revenue for its clients. With over 50 web design awards under our belt, we're confident we can design a custom website that drives sales for your unique business.
-
Elisc is a leading web design agency with an award-winning design team that creates innovative, effective websites that capture your brand, improve your conversion rates, and maximize your revenue to help grow your business and achieve your goals.
In today’s digital world, your website is the first interaction consumers have with your business. That's why almost 95 percent of a user’s first impression relates to web design. It’s also why web design services can have an immense impact on your company’s bottom line.
That’s why more companies are not only reevaluating their website’s design but also partnering with Elisc, the web design agency that’s driven more than $2.4 billion in revenue for its clients. With over 50 web design awards under our belt, we're confident we can design a custom website that drives sales for your unique business.
-
Elisc is a leading web design agency with an award-winning design team that creates innovative, effective websites that capture your brand, improve your conversion rates, and maximize your revenue to help grow your business and achieve your goals.
In today’s digital world, your website is the first interaction consumers have with your business. That's why almost 95 percent of a user’s first impression relates to web design. It’s also why web design services can have an immense impact on your company’s bottom line.
That’s why more companies are not only reevaluating their website’s design but also partnering with Elisc, the web design agency that’s driven more than $2.4 billion in revenue for its clients. With over 50 web design awards under our belt, we're confident we can design a custom website that drives sales for your unique business.
-
Elisc is a leading web design agency with an award-winning design team that creates innovative, effective websites that capture your brand, improve your conversion rates, and maximize your revenue to help grow your business and achieve your goals.
In today’s digital world, your website is the first interaction consumers have with your business. That's why almost 95 percent of a user’s first impression relates to web design. It’s also why web design services can have an immense impact on your company’s bottom line.
That’s why more companies are not only reevaluating their website’s design but also partnering with Elisc, the web design agency that’s driven more than $2.4 billion in revenue for its clients. With over 50 web design awards under our belt, we're confident we can design a custom website that drives sales for your unique business.
-
Elisc is a leading web design agency with an award-winning design team that creates innovative, effective websites that capture your brand, improve your conversion rates, and maximize your revenue to help grow your business and achieve your goals.
In today’s digital world, your website is the first interaction consumers have with your business. That's why almost 95 percent of a user’s first impression relates to web design. It’s also why web design services can have an immense impact on your company’s bottom line.
That’s why more companies are not only reevaluating their website’s design but also partnering with Elisc, the web design agency that’s driven more than $2.4 billion in revenue for its clients. With over 50 web design awards under our belt, we're confident we can design a custom website that drives sales for your unique business.
-
Elisc is a leading web design agency with an award-winning design team that creates innovative, effective websites that capture your brand, improve your conversion rates, and maximize your revenue to help grow your business and achieve your goals.
In today’s digital world, your website is the first interaction consumers have with your business. That's why almost 95 percent of a user’s first impression relates to web design. It’s also why web design services can have an immense impact on your company’s bottom line.
That’s why more companies are not only reevaluating their website’s design but also partnering with Elisc, the web design agency that’s driven more than $2.4 billion in revenue for its clients. With over 50 web design awards under our belt, we're confident we can design a custom website that drives sales for your unique business.
Recent completed works
-
We live in a world where we need to move quickly and iterate on our ideas as flexibly as possible. Building mockups strikes the ideal balance ease of modification. Building mockups strikes the ideal balance ease of modification.
Mockups are useful both for the creative phase of the project - for instance when you're trying to figure out your user flows or the proper visual hierarchy - and the production phase when they phase when they will represent the target product. Building mockups strikes the ideal balance ease of modification.
- Client Alvaro Morata
- Category Modalbox
- Date April 10, 2023
- Share
What client's say?
-
I rarely like to write reviews, but the Marketify team truly deserve a standing ovation for their customer support, customisation and most importantly, friendliness and professionalism.
John Doe
User Interface Design at PCL Lab
-
Really the Code Quality, Customer Support, and design are awesome and its good support they are giving. They give an instant solution to our needs. Really awesome. I will strongly recommend to my friends.
Keita Smith
Senior Designer at Behance
-
Loved the template design, documentation, customizability and the customer support from Marketify team! I am a noob in programming but the Marketify team helped me successfully.
Alan Walker
Sales Manager at Vivaco Shop
My blog & news
-
Elisc is a leading web design agency with an award-winning design team that creates innovative, effective websites that capture your brand, improve your conversion rates, and maximize your revenue to help grow your business and achieve your goals.
In today’s digital world, your website is the first interaction consumers have with your business. That's why almost 95 percent of a user’s first impression relates to web design. It’s also why web design services can have an immense impact on your company’s bottom line.
That’s why more companies are not only reevaluating their website’s design but also partnering with Kura, the web design agency that’s driven more than $2.4 billion in revenue for its clients. With over 50 web design awards under our belt, we're confident we can design a custom website that drives sales for your unique business.
-
Elisc is a leading web design agency with an award-winning design team that creates innovative, effective websites that capture your brand, improve your conversion rates, and maximize your revenue to help grow your business and achieve your goals.
In today’s digital world, your website is the first interaction consumers have with your business. That's why almost 95 percent of a user’s first impression relates to web design. It’s also why web design services can have an immense impact on your company’s bottom line.
That’s why more companies are not only reevaluating their website’s design but also partnering with Kura, the web design agency that’s driven more than $2.4 billion in revenue for its clients. With over 50 web design awards under our belt, we're confident we can design a custom website that drives sales for your unique business.
-
Elisc is a leading web design agency with an award-winning design team that creates innovative, effective websites that capture your brand, improve your conversion rates, and maximize your revenue to help grow your business and achieve your goals.
In today’s digital world, your website is the first interaction consumers have with your business. That's why almost 95 percent of a user’s first impression relates to web design. It’s also why web design services can have an immense impact on your company’s bottom line.
That’s why more companies are not only reevaluating their website’s design but also partnering with Kura, the web design agency that’s driven more than $2.4 billion in revenue for its clients. With over 50 web design awards under our belt, we're confident we can design a custom website that drives sales for your unique business.
-
Elisc is a leading web design agency with an award-winning design team that creates innovative, effective websites that capture your brand, improve your conversion rates, and maximize your revenue to help grow your business and achieve your goals.
In today’s digital world, your website is the first interaction consumers have with your business. That's why almost 95 percent of a user’s first impression relates to web design. It’s also why web design services can have an immense impact on your company’s bottom line.
That’s why more companies are not only reevaluating their website’s design but also partnering with Kura, the web design agency that’s driven more than $2.4 billion in revenue for its clients. With over 50 web design awards under our belt, we're confident we can design a custom website that drives sales for your unique business.
-
Elisc is a leading web design agency with an award-winning design team that creates innovative, effective websites that capture your brand, improve your conversion rates, and maximize your revenue to help grow your business and achieve your goals.
In today’s digital world, your website is the first interaction consumers have with your business. That's why almost 95 percent of a user’s first impression relates to web design. It’s also why web design services can have an immense impact on your company’s bottom line.
That’s why more companies are not only reevaluating their website’s design but also partnering with Kura, the web design agency that’s driven more than $2.4 billion in revenue for its clients. With over 50 web design awards under our belt, we're confident we can design a custom website that drives sales for your unique business.
-
Elisc is a leading web design agency with an award-winning design team that creates innovative, effective websites that capture your brand, improve your conversion rates, and maximize your revenue to help grow your business and achieve your goals.
In today’s digital world, your website is the first interaction consumers have with your business. That's why almost 95 percent of a user’s first impression relates to web design. It’s also why web design services can have an immense impact on your company’s bottom line.
That’s why more companies are not only reevaluating their website’s design but also partnering with Kura, the web design agency that’s driven more than $2.4 billion in revenue for its clients. With over 50 web design awards under our belt, we're confident we can design a custom website that drives sales for your unique business.
-
Elisc is a leading web design agency with an award-winning design team that creates innovative, effective websites that capture your brand, improve your conversion rates, and maximize your revenue to help grow your business and achieve your goals.
In today’s digital world, your website is the first interaction consumers have with your business. That's why almost 95 percent of a user’s first impression relates to web design. It’s also why web design services can have an immense impact on your company’s bottom line.
That’s why more companies are not only reevaluating their website’s design but also partnering with Kura, the web design agency that’s driven more than $2.4 billion in revenue for its clients. With over 50 web design awards under our belt, we're confident we can design a custom website that drives sales for your unique business.
आमच्याशी संपर्क साधा
तुमची काय समस्या आहे. कृपया आम्हाला एक ओळ टाका - आमचे तज्ञ तुमच्याशी संपर्क साधतील.
